प्रत्येक मतदार परिवर्तनाच्या लढाईत सहभागी होईल निशिकांत भोसले-पाटील : येडेमच्छिंद्र, किल्लेमच्छिंद्रगड, नरसिंहपूर येथे विविध विकास कामांचा शुभारंभ



इस्लामपूर : प्रतिनिधी 

वाळवा तालुक्याला क्रांतिकारकांचा वारसा आहे. येथील जनतेच्या प्रश्नासाठी गेल्या दहा वर्षापासुन लढत आलो आहे,मदतीला धावत आलो आहे, अन्याय व हुकुमशाही यापुढे मी व माझा स्वाभीमानी मतदार सहन करणार नाही. ही निवडणुक तुमच्या माझ्या स्वाभीमानाची आहे,या निवडणुकीत परीवर्तनाच्या बाजुने ठाम उभा राहावा असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांनी केले.


येडेमच्छिंद्र (ता.वाळवा) येथे १ कोटी ७२ लाख ६२ हजार तर किल्लेमच्छिंद्रगड येथे १ कोटी ३५ लाख व नरसिंहपूर येथे ३६ लाख रुपये निधीच्या विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपा विधानसभा प्रभारी प्रसाद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे, तालुकाध्यक्ष निवास पाटील, महिला आघाडी अध्यक्षा सुरेखाताई जगताप, दादासाहेब रसाळ प्रमुख उपस्थित होते.


निशिकांत भोसले-पाटील (दादा) म्हणाले, वाळवा तालुक्यातील २५ ते ३० टक्के जनता शेतात वास्तव्यास आहे. त्यांना अनेक वर्षांपासून गुडघाभर चिखलातून ये-जा करावी लागते, हे त्यांचे दुर्देव आहे. येथील लोकप्रतिनिधींना ३५ वर्षात साधे पाणंद रस्त्यांचे प्रश्न सुटले नाहीत. तरुणांना रोजगार देण्यात ते अपयशी ठरले आहेत. तसेच उसाच्या दराबाबत कोण आडवे येते, हे साऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना माहीत आहे. तुमच्या उसावर विद्यमान आमदारांनी एका कारखान्याचे चार कारखाने केले. तुम्हाला काय मिळाले? तुमची होणारी लूट व तुमच्यावर होणारा अन्याय थांबवाचा असेल तर तुमच्या एका मतात फार ताकत आहे. तुमचे एक मत निष्क्रिय आमदाराला घरी बसवू शकते. येथील जनतेने हुकूमशाही इंग्रजांना सोळंकी पळो करून सोडले होते. त्या क्रांतिकारकांचा वारसा आपलेला जपायचा आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे तुमच्यावर अन्याय करणाऱ्या  हुकूमशाही नेतृत्वाला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पराभुत करण्याठी सज्ज व्हा.



येडेमच्छिंद्र येथे बबनराव खंडागळे, बाबूराव पाटील, शंकर पाटील, उपसरपंच डॉ.सचिन पाटील, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सरचिटणीस संदीप सावंत, ओबीसी मोर्चा अध्यक्ष मधुकर हुबाले, ग्रामपंचायत सदस्या वानिता पाटील, अनिता पाटील, रावसाहेब पाटील, शरद पाटील, सुभाष चव्हाण,  प्रशांत पाटील, गणेश हराळे, राहुल खराडे, संतोष पाटील, अरुण कांबळे, मानसिंग कदम, सत्यवान शेवाळे, बाजीराव आदाटे, सुरेश जगताप तर किल्लेमच्छिंद्रगड येथे सरपंच वैशालीताई साळुंखे, शशिकांत साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी मोरे, हारून शिकलगार, सतीश मोरे, राजेंद्र कारंडे, शिवाजी पवार, सदस्या रेखाताई कदम, लीलाताई चव्हाण, शारदा कदम, शितल कांबळे, यात्रा कमिटी अध्यक्ष प्रदीप यादव, सचिन जाधव, मच्छिंद्र शिर्के, तुकाराम मठकरी, अमोल डूबल, तंटामुक्ती उपाध्यक्ष अजित पाटील, रवींद्र मोरे व नरसिंहपूर येथे सरपंच शोभाताई जगताप,  ग्रामपंचायत सदस्य दिपाली धुमाळ, रामचंद्र उदुगडे, प्रकाश हॉस्पिटल मानद संचालक सुभाष जगताप, भानुदास पाटोळे, सुरेश धुमाळ, हणमंत पाटील, विक्रम पाटील, सुनील मदने, उल्हास कुंभार, आत्माराम मदने, अमोल गुरव, निलेश कांबळे, सुभाष धुमाळ, निशिकांत मदने, सुनील साळुंखे, वसंत शिंदे, शामराव जगताप, एकनाथ यादव, निवास पाटील, जगन्नाथ कुरळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post