सध्या कृष्णा नदीला महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सांगलीमध्ये सन 2005, 2019, 2021 पासून वारंवार पूर येत आहे. सध्या कृष्णा नदीची पातळी साधारण 32 फुटापर्यंत आहे. सद्यस्थितीला माधवनगर ओवर ब्रिजचे काम सुरू असल्याकारणाने तासगाव मार्गे येणारी वाहतूक संजय नगर, महावीर ब्रिज मार्गे सांगली शहरात येते. अथवा शिवशंभू चौक मार्गेच सांगली शहरात येते.
सन 2021 च्या महापुरा वेळी कॉलेज कॉर्नर परिसरात एक जड वाहन अडकल्यामुळे साधारणतः साडेचार तास वाहतूक शहरात खोळंबली होती. साधारणता 40 फूट नदीची पाणी पातळी झाल्यानंतर इस्लामपूर शहराशी सांगलीचा संपर्क तुटतो. येत्या 24 तासांमध्ये पावसाचा जोर ओसरला नाही तर पाणी पातळी 40 फूट ओलांडू शकते. अशा परिस्थितीत पूरग्रस्तांना स्थलांतरित करणे, व्यापाऱ्यांना स्थलांतरित करणे, जनावरे व इतर बाबी स्थलांतरित करीत असताना वाहतूक कोंडी होऊन प्रशासनाला काम करणे अडचणीचे जाते. याची पूर्व खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाने आत्तापासूनच वाहतूक व जड वाहनांचे नियोजनाची योग्य ती खबरदारी घ्यावी. जेणेकरून नागरिकांना व प्रशासनास याचा त्रास होणार नाही.
यापूर्वीचा अनुभव पाहता परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर वाहतूक नियंत्रक शाखा हातबल होते, व कोणतेही वाहतुकीचे नियोजन वाहतूक शाखेकडून होत नाही. तरी याबाबत संबंधितांना आपले स्तरावर योग्य ते आदेश व्हावेत ही विनंती.
Tags
सांगली प्रतिनिधी