सांगली प्रतिनिधी
कृष्णा, वारणा व पंचगंगा नदीच्या महापुराबाबत उच्चस्तरीय समिती नेमून याचा पाठपुरावा करावा भविष्यात पूर येऊ नये यासाठी नियोजन करावे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना काँग्रेस पक्षाच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांनी दिले आहेत,
सध्या कृष्णा नदीला महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सांगलीमध्ये सन 2005, 2019, 2021 पासून वारंवार पूर येत आहे. पूर आला की वेगवेगळ्या समित्या नेमल्या जातात. त्या समितांमार्फत अहवाल मागविले जातात, अलमट्टी मुळे पूर येतो, वारणा, पंचगंगा या नद्यांची पाणी पातळी वाढल्यामुळे पूर येतो असे वेगवेगळे अहवाल येतात. याबाबत उच्च स्तरावर केंद्रीय जल मार्गदर्शन तत्त्वानुसार कामकाज करण्यात येत नाही. हे नियोजन आता महापूर सदृश्य परिस्थिती असतानाच समिती नेमून करण्यात यावे. जेणेकरून महापूर हा नक्की कोणत्या कारणामुळे येतो याचे योग्य निदान लागेल. तरी सद्य परिस्थितीला आपण याबाबत तात्काळ एक समिती नेमून याबाबत योग्य ती कार्यवाही करून महापूर येण्याची नेमकी कारणे काय व यावर काय उपाय करता येईल यासाठी आपण उच्च स्तरावर पाठपुरावा करावा. तसेच महापूर आल्यानंतर सांगली शहराचा पाणीपुरवठा बंद पडतो तो बंद पडू नये म्हणून काय उपाययोजना केल्या आहेत ते बघावे
अशी मागणी जयश्री मदन पाटील यांनी
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, अधीक्षक अभियंता सो, पाटबंधारे विभाग सांगली, एका निवेदनाद्वारे केली आहे,
Tags
सांगली महापूर