ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी बांधवांनी एकत्र यावे-- वडार कॉलनीतील बैठकीत सूर

 


सांगली प्रतिनिधी 

       समस्त महाराष्ट्रातील ओबीसी समाजावर आरक्षणाच्या माध्यमातून जो अन्याय सुरू आहे या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी ओबीसी बांधवांनी एकत्र येण्याची गरज असून ,राज्य शासनाकडून मराठा समाजाचे लाड पुरवले जातात तर ओबीसी समाजाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे .म्हणून ओबीसी समाजाच्या अस्तित्वासाठी ओबीसी एल्गार महामेळावा 11 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला असून ,तळागाळातील ओबीसी,व्हिजेएनटी, एसबीसी,लिंगायत मुस्लिम ओबीसी, बलुतेदार, आलूतेदार यांच्या न्याय हक्कांसाठी तसंच मुला बाळांच्या भविष्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. असा सूर सात ऑगस्ट रोजी सायंकाळी सांगलीतील वडार कॉलनीतील बैठकीत उमटला आहे .

       

यावेळी माजी नगरसेविका वर्षा निंबाळकर, राहुल वडर, मोहन गुंजी, सतीश कलगुटगी, राजकलगुटगी संतोष कलगुटगी,राहुल धोत्रे, रवी कलगुटगी, यांनी सदर बैठकीचे नियोजन केलं होतं .यावेळी वरून खुंटे, लक्ष्मण वडर, प्रथमेश वडर, संदीप वडर,धनंजय वडर, सुनील पवार, मयुरेश गुंजी, विशाल नाईक, धनंजय कलगुटगी,उपस्तीत होते.

Post a Comment

Previous Post Next Post