सांगली दि.९: वानलेसवाडी हा सांगलीचा विस्तारीत भाग पन्नास एक वर्षांपूर्वी वसलेला आहे.मध्यमवर्गीय व वंचित कष्टकरी अशी संमिश्र लोकवस्तीच्या या भागात शुध्द व मुबलक पाणी पुरवठा होत नाही.दर्जेदार रस्ते व गटारी नाहीत. स्वच्छता नसते.गेल्या दहा वर्षात विद्यमान आमदार या भागात कधी फिरकलेच नाहीत. स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. आमच्या भागातील युवा वर्गाला रोजगार नाही. महागाई प्रचंड वाढली आहे. आता विद्यमान आमदारांना आम्ही घरी बसवणार आहे. पृथ्वीराजबाबा पाटील यांनी सांगलीसाठी भरीव कामगिरी केली आहे. तेच आमदार पदाला न्याय देऊ शकतात. वानलेसवाडीतून पृथ्वीराजबाबा यांना उच्चांकी मतांची लिड देणार असे प्रतिपादन या भागातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश बंडगर यांनी केले आहे.
पृथ्वीराज पाटील यांनी वानलेसवाडी येथील रेणुका मंदिरात दर्शन घेऊन गृहभेटीतून हात चिन्हासमोरील बटण दाबून भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले. त्या वेळी ते बोलत होते.
पृथ्वीराज पाटील यांनी सांगली अधिक चांगली करण्यासाठी मी विकास आराखडा तयार केला आहे. जनतेत जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. मला पाच वर्षाची संधी द्या आपला विश्वास सार्थ करीन.असे सांगितले.
आज प्रभाग क्र. १९ - वानलेसवाडी मध्ये मा. पृथ्वीराजबाबा पाटील यांनी रेणुकादेवीचे दर्शन घेतले आणि गृहभेटीतून हात चिन्हासमोरील बटण दाबून भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले
यावेळी अजय देशमुख,नितीन तावदारे, सुरेश बंडगर, प्रियांका बंडगर, अरुणदादा चव्हाण राष्ट्रवादी शहराध्यक्ष, अनिकेत गायकवाड, प्रकाश ननावरे
दयानंद शिवशरण, मुकेश गायकवाड शिवसेना उबाठा , अजीम मुल्ला, राहूल जाधव, मराठा मंडळ, प्रशांत पवार अमोल बोराडे विजय सावंत,सचिन, स्वाती व सुनिल कांबळे, प्रकाश ननावरे, राजू सनदी, गिरीधर खंदारे, प्रदीप तांदळे, आशिस व राकेश, संजय कांबळे,प्रकाश मोरे,नितीन माने, प्रा. एन.डी.बिरनाळे, विकास पाटील, रघुनाथ नार्वेकर, आयुब निशाणदार व परिसरातील नागरिक उपस्थित होते.