काँग्रेसच्या श्रमपरिहारला बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांची उपस्थिती ---- संजय विभुते


सांगली प्रतिनिधी 
महाविकास आघाडीच्या विरोधात सांगली लोकसभा मतदार संघातून बंडखोरी केलेल्या विशाल पाटील यांना बोलावून काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी कार्यकर्त्यांचा श्रमपरिहार केला. सांगलीत शिवसेनेच्या विरोधात अंडरग्राऊंड सगळी यंत्रणा पृथ्वीराज पाटील हाताळत होते. शिवसेनेच्या व्यासपीठावर थोडा वेळ बसायचे आणि खाली उतरले की विशाल यांच्या कामाला लागायचे. आता विशाल पाटील यांच्यासह पृथ्वीराज पाटील यांचीदेखील काँग्रेसने हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी केली आहे.    
पृथ्वीराज पाटील यांनी आमदार विश्‍वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रमपरिहार जेवन दिले. त्यावर श्री. विभुते यांनी सडकून टीका केली. हा श्रमपरिहार नव्हे तर शिवसेनेच्या जखमेवर चोळलेले मीठ आहे. आम्ही याचा वचपा नक्की काढू.
सांगली ,तासगाव-कवठेमहांकाळ, जत या विधानसभा मतदार संघात काँग्रेसचा राष्ट्रवादीच्यां उमेदवारI ला विधानसभेची पायरी चढू देणार नाही, अशी शपथ शिवसैनिकांनी घेतली आहे, असा इशारा त्यांनी दिला.  
ते म्हणाले, ‘‘महाविकास आघाडी एकमेकाच्या विचारातून लढली. तशाच जागा ठरल्या. जागा वाटपापर्यंत वादग ठीक होता, नंतर जे झाले तो घात होता. राष्ट्रवादीने उलटे काम केलेच, पण काँग्रेसने एकदाही शिवसेनच्या प्रचारात सहभाग घेतला नाही. काही तात्पुरते आले आणि नंतर विशाल पाटलांच्या प्रचारात सहभागी झाले. जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांनी तर ‘आमचे दुश्‍मन विलासराव जगताप याना भेटायला खासदार संजय राऊत यांना घेऊन का गेलात?’ असा सवाल केला. जगतापांनी विशाल पाटलांना पाठींबा दिलेला चालतो. त्याच विशाल पाटलांचे तुम्ही काम करता आणि आम्ही फक्त भेटलो तर तुम्हाला राग का यावा? स्वतःचा तो बाब्या आणि दुसऱ्याचे कारटे ही भूमिका बरोबर नाही.’’
ते म्हणाले, ‘‘काँग्रेसचा राज्यातील एकही नेता सांगली तील महाविकास आघाडीच्या प्रचाराला आला नाही. बंडखोर हा काँग्रेसचाच आहे, असे त्यांनी भासवले. सांगलीतील पृथ्वीराज पाटील यांनी निकालाची वाट न पाहता बंडखोराला बोलावले, तो काँग्रेसचा आहे असे दाखवत त्यांच्या सोबत स्नेहभोजन केले आणि वरून म्हणतात कार्यकर्ते प्रचाराला राबले त्यांना स्नेहभोजन नाच्या निमित्ताने एकत्र करून विधानसभेच्या तयारीला लागण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं पण ऋतुराज पाटील साहेब त्यांनी प्रचार नेमका केला कोणाचा तुमचे काँग्रेसचे पदाधिकारी कोणासाठी राबले? बंडखोरी केलेल्या उमेदवारासाठी याचा पुरावा पण दिलात याची पृथ्वीराज पाटील, विक्रम सावंत यांना किंमत मोजावी लागेल. पृथ्वीराज पाटिल यांनी विशाल पाटलांच्या प्रचारात सगळी यंत्रणा राबवल्याचे लपून राहिले नाही. ते सांगायला ज्योतिषाची गरज नाही. त्यांचा मुलगा वीरेंद्र पाटील उघडपणे, मुठी आवळून भाषण करत होता. विशाल पाटील यांच्या बरोबरीने पृथ्वीराज पाटील यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.’’
-----------

जयंतराव काय
आदर्श घ्यावा?
 
जयंत पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. जयंतराव पाटील साहेबांनी उद्धव ठाकरे साहेबांच्या सभेमध्ये जबरदस्त भाषण केले आणि महाविकास आघाडीच्या विरोधात काम करणाऱ्याला माझा शेवटचा नमस्कार अशा पद्धतीने सगळ्यांच्या मनाला भावेल अशा पद्धतीचे भाषण केलं परंतु सांगली जिल्ह्यात त्यांचे लोक भाजपचा आणि अपक्षाचा प्रचार करत होते. जयंतराव त्यांना अडवू शकले नाहीत. मग त्यांच्या पदाचा उपयोग काय? जयंतरावांचे हे होम-पीच आहे. महाराष्ट्राने त्यांच्याकडून काय आदर्श घ्यावा, असा सवाल संजय विभुते यांनी केला.

Post a Comment

Previous Post Next Post