सांगली माधवनगर रोडवरील चिंतामणनगर रेल्वे पुलाचे काम अतिशय संत गतीने चालू असून मागील गेली दीड वर्षापासून चालू आहे. वास्तविक संबंधित प्रशासनाने आठ ते नऊ महिन्यात काम पूर्ण होईल असे आश्र्वत केले होते. परंतु येथून पुढेहि सहा ते सात महिने काम पूर्ण होणार नाही असे दिसते. आठ ते नऊ महिन्यात पूर्ण होणारे काम दोन वर्षे लागत असतील, तर छोट्या व्यवसायिकांनी व्यवसाय करायचा कसा? पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असून कामास विलंब होणार याबद्दल शंका नाही. मागील जवळपास दीड वर्षापासून या रस्त्यावर कॉलेज कॉर्नर ते माधवनगर जकात नाका परिसरामध्ये जे छोटे-मोठे व्यवसायिक आहेत, त्यांचा संसार हा देशोधडीला लागला असून यामध्ये फळ विक्रेते, चहाची हातगाडी, सलून व्यवसायिक रिक्षा तसेच छोटे-मोठे हातावर पोट असणारे छोटे व्यवसायिक यांचा व्यवसाय ठप्प झाला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाच्या दिरंगाई मुळे ही वेळ आली असून त्यांना नुकसान भरपाई शासनाकडून मिळावी. विकास कामांना आमचा विरोध नाही, पण सामान्य जनतेचा संसार देशोधडीला लावून उपासमारीची वेळ त्यांच्यावर आणून हा कसला विकास चालू आहे हे समजण्यापलीकडे आहे. तरी ज्यांचा व्यवसाय बुडाला आहे त्यांचा सर्वे करून कमीत कमी मासिक 10 हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावी ही विनंती.
Tags
सांगली प्रतिनिधी