सांगली प्रतिनिधी : मिरज पूर्व भागातील काँग्रेसचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य व मिरज पंचायत समितीचे माजी सभापती तानाजीराव पाटील हे शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे आणि खासदार संजयकाका पाटील यांनी मिरज पूर्व भागामध्ये प्रचंड विकास कामे केली आहेत. म्हैसाळ योजना सलग दीड वर्षे चालू ठेवल्यामुळे पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न मिटला आहे. त्यामुळेच आम्ही संजयकाकांच्या पाठीशी उभे राहिलो आहोत. शेकडो कार्यकर्ते प्रचारात दिमतीला असून या भागातून संजयकाकांना मताधिक्य देण्याचा निर्धार आम्ही केला आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
तानाजीराव पाटील म्हणाले, पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी या भागामध्ये प्रचंड विकास कामे केलेली आहेत. माजी आमदार विठ्ठलदाजी पाटील यांच्यानंतर या भागात संजयकाका आणि सुरेशभाऊ खाडे यांनीच सगळ्यात जास्त निधी दिला आहे. स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच सलग दीड वर्ष म्हैसाळ पाणी योजना सुरू ठेवल्यामुळे या भागातला पिण्याचा पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. अन्यथा टँकर सुरू करावे लागले असते. चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असता. परंतु पाणी सुरू असल्यामुळे पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न मिटला आहे. यापूर्वी कधीही आंदोलन केल्याशिवाय म्हैसाळ योजनेचे पाणी मिळत नव्हते परंतु पहिल्यांदाच कोणतेही आंदोलन न करता संजयकाकांच्या माध्यमातून म्हैसाळ योजना सुरू राहिली आहे. त्यामुळे शेतकरी आनंदात आहेत.
संजयकाका पाटील यांनी सलगरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पाच कोटींचा निधीही दिला. त्यामुळे या भागातल्या नागरिकांच्या आरोग्यासाठी फार मोठी सुविधा निर्माण झाली आहे.
शेती आरोग्य याचबरोबर विविध विकास कामे केलेली आहेत. आमच्या काँग्रेसच्या नेत्यांनी आतापर्यंत आमच्यासाठी जे केलं नाही ते या भाजपच्या नेत्यांनी केला आहे म्हणूनच कार्यकर्त्यांनी संजय काका पाटील यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही सलगरे आरग देगलूर खटाव जानराव वाडी यास भागातील अनेक गावांमध्ये प्रचाराचा धडाका सुरू ठेवला आहे त्यामुळे संजय का पाटील यांना या भागातून मताधिक्य मिळणार आहे आणि त्यासाठीच आम्ही गतिमान प्रचार करत आहोत असे तानाजीराव पाटील यांनी सांगितले.
भारतीय जनता पार्टी जर आमच्या भागाचा विकास करत असेल संजयकाका आमच्या अडीअडचणींना धावून येणार असतील तर त्यांच्या मागे राहणे हे आमचे कर्तव्य आहे. अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. आम्ही काँग्रेसमध्ये असलो तरी भागाच्या विकासाला प्राधान्य दिले पाहिजे. यासाठीच आम्ही हा निर्णय घेतला आहे. असेही तानाजीराव पाटील यांनी सांगितले.
विजय शिंदे, सुनील निंबाळकर, रमेश राजगे, आनंदा पवार, अशोक हारगे, सदाशिव कोष्टी, रमेश माळी, सतीश हारगे, रमेश चाळके यांच्यासह काँग्रेस मधले शेकडो कार्यकर्ते संजयकाका पाटील यांचा प्रचार करत आहे.
Tags
सांगली प्रतिनिधी