इस्लामपूर : प्रतिनिधी
ही विधानसभा निवडणूक तुमच्या माझ्या स्वाभिमानाची आहे. या निवडणुकीत तुम्ही परिवर्तन घडवा. मी तुम्हाला शब्द देतो की, त्यानंतर सर्वोदय कारखाना सभासदांच्या मालकीचा केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. त्यासाठी कोणती किंमत मोजावी लागली तर मी ती मोजायला तयार आहे, असे आश्वासन इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांनी दिले.
इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील
कसबे डिग्रज, मौजे डिग्रज येथे प्रचार सभे दरम्यान ते बोलत होते. यावेळी भीमराव माने, सागर खोत, प्रसाद पाटील, केदार पाटील, निवास पाटील प्रमुख उपस्थित होते
निशिकांत भोसले-पाटील (दादा) म्हणाले, कसबे डिग्रज व मौजे डिग्रज ही पराक्रम व शौर्याचा वारसा असणारी गावे आहेत. मी ही निवडणूक कोणाला हरवण्यासाठी लढवत नाही. गेल्या ३५ वर्षात माझ्या विरोधात निवडणूक लढवणारा पुढल्या निवडणुकीला माझ्या व्यासपिठावर असतो, असा गैरसमज असणाऱ्या विचारा विरोधात माझी लढाई आहे. २००९ साली तुमची गावे इस्लामपूर मतदान संघात आली. त्यानंतर १५ वर्षे या आमदारांना तुम्ही मताधिक्य देत आलात. पण तुम्हाला त्यांनी काय दिलं. गेल्या १५ वर्षात त्यांना या गावचे रस्ते करता आले नाहीत. स्व. संभाजी पवार व स्व.मदन पाटील यांनी केलेले रस्ते आजही तसेच आहेत. ते दोघेही आज हयात असते तर मला तुम्हा पुढे यायची गरज भासली नसती. ज्यांना तुंगाच्या पुढे कोण ओळखत न्हवते, त्यांना आप्पांनी सांगलीत आणून ओळख निर्माण करून दिली. त्या आप्पांची त्यांनी काय अवस्था केली, तुम्ही बघितले. त्यांनी निर्माण केलेला कारखाना यांनी घशात घातला. किती यातना त्यांना झाली असतील. स्व.वसंतदादांच्या घराण्याला ही ते राजकीय दृष्ट्या त्रास देत आले आहेत. स्व.पतंगराव कदम, स्व.आर.आर.पाटील यांच्यासह जिल्हयातील सर्वच नेत्यांना त्रास या नेत्याने दिला. त्यामुळे ही एक व्यक्ती नसून प्रवृत्ती आहे. या प्रवृत्तीला धडा शिवण्यासाठी मला या विधानसभा निवडणुकीत मताधिक्य द्या व परिवर्तन घडवा. नक्कीच येणाऱ्या पाच वर्षात तुमच्या स्वप्नातील आदर्शवंत मतदार संघाची बांधणी झालेली तुम्हाला दिसेल.
यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होत
आमदार तुमच्या गावी संकल्पना राबवणार...
इस्लामपूर विधानसभा मतदार संघात सरळ रस्ते नाहीत, पियायला पाणी नाही, उसाला दर नाही, तरुणांना रोजगार नाही. माणसात माणूस यांनी ठेवला नाही आणि हे म्हणतात मी विकास केला. या माणसाला १५ वर्षे तुम्ही सोसलं. पण यापुढे तुम्ही त्यांना सोसलं तर तुम्हाला तुमची पुढली पिढी माफ करणार नाही. तुम्हाला तुमचा सर्वांगीण विकास हवा असेल तर मला तुमच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी विधानसभेत पाठवा. त्यानंतर मी आमदार तुमच्या गावी संकल्पना राबवून २४ तास तुमच्या सेवेसाठी उपलब्ध असे
Tags
सांगली प्रतिनिधी