सांगली प्रतिनिधी
अखेरच्या दिवसापर्यंत अपक्ष उमेदवार , जयश्री पाटील यांचा अर्ज माघार न घेतल्यामुळे, दुरंगी होणाऱ्या लढतीला आता तिरंगी चे स्वरूप आलेला आहे , भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ आणि काँग्रेस पक्षातील बंडखोर उमेदवार जयश्री वहिनी मदन पाटील यांच्याबरोबर पृथ्वीराज पाटील यांची लढत होणार आहे . काँग्रेसच्या बंडामुळे त्यांची अवस्था कमकुवत होईल असे अनेकांना वाटले होते , परंतु प्रचार शुभारंभाच्या दिवशी राज्याचे नेते आमदार विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीमुळे , एक नवी भरारी घेण्याची ताकद त्यांच्यामध्ये आलेली आहे , सांगली मतदारसंघात पाच वर्षांपूर्वी पृथ्वीराज पाटील आणि सुधीर गाडगीळ यांच्या बरोबर टक्कर झाली होती थोडक्यात मतांनी पृथ्वीराज पाटील यांचा पराभव झाला होता ,
सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला संधी मिळाली की बंडखोरी केले जाते यामुळे पृथ्वीराज पाटील मैदानात उतरले आहेत .
दोन-चार पुल , बांधले आणि पत्र दिले म्हणजे सांगलीचा विकास झाला असे नाही , जर पत्र देऊनच सगळी कामे होत असते , तर विधान परिषदेमध्ये , जाण्याचा हट्ट का असा टोलाही त्यांनी लगावला .
पृथ्वीराज पाटील यांनी मोठ्या ताकतीने पक्षाचा प्रचार करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे साहजिकच त्यांच्या कार्यकर्त्यांची उमेद वाढली आहे , आणि त्यामध्येच आमदार विश्वजीत कदम यांनी त्यांना बळ दिले आहे त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह आणखी जोमाने वाढलेला आहे.
Tags
सांगली प्रतिनिधी