अंजनीकरांच्या घाणेरड्या राजकारणाला कवठेमहांकाळ च्या कार्यकर्त्याची चपराक - जनार्धन पाटील भा.ज.पा कवठेमंकाळ तालुका अध्यक्ष

*अय्याज मुल्ला यांनी माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या वरती केलेली खोटी तक्रार आज अखेर मागे घेतली*

अत्यंत हाय व्होल्टेज असलेल्या सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथील दोन दिवसांच्या राजकीय वातावरणात वरवर तरी शांत झालेले दिसत आहे.

या घटनेत माजी संजयकाका पाटील यांच्या खोटी विरोधात तक्रार करणाऱ्या अय्याज मुल्ला यांनी माघार घेतल्यामुळे पुन्हा एकदा हा प्रकार केवळ संजयकाका पाटील यांच्या बदनामीसाठी रोहित पाटील व सुरेश पाटील यांच्या सांगण्यावरून करण्यात आला होता हे सिद्ध झालं आहे. 

मुळात संजयकाका पाटील हे वाद मिटवण्यासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी घडलेल्या घटनेला अत्यंत चुकीच्या पद्धतीने मांडत रोहित पाटील यांनी दोन दिवस केवळ राजकीय स्टंट केला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.यापूर्वी देखील रोहित पाटलांनी उपोषण असेल किंवा पाणी सोडण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये केलेले आंदोलन असेल त्यावेळी देखील अशाच प्रकारे स्टंट केला होता.
        खरे तर समोरासमोर बसून अय्याज मुल्ला यांच्या घरी हा विषय संपला होता, माजी खासदार संजयकाका पाटील यांनी कालही त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये या गोष्टीचा उल्लेख केला होता, तरी देखील तीन चार तास पोलीस स्टेशन वेठीस धरून प्रसिद्धी मिळवणे ,हा एकमेव हेतू यामधून दिसत होता आणि अय्याज मुल्ला यांच्यावरती माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यावर खोट्या तक्रार दाखल करण्यासाठी दबाव टाकण्यात आला ,त्या दबावाला बळी पडून अय्याज मुल्ला यांनी तसं पोलीस स्टेशनमध्ये कथन केले , तक्रार केली परंतु वस्तुस्थितीची जाणीव झाल्यानंतर याच अय्याज मुल्ला यांनी पूर्ण विचारांती त्यांची तक्रार आज मागे घेतली आणि हा वाद मिटला आहे हे माहीत असताना सुद्धा रोहित पाटील यांनी आज परत लोकांची जमवाजमव करून कवठेमंकाळची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला .खरे तर यामागे संजयकाकांच्या वरती आरोप केल्याशिवाय प्रसिद्ध मिळणार नाही आणि निवडणुकीआधी स्टंटबाजी करण्याची संधी आपल्या हातून सुटेल, असे वाटल्यामुळे रोहित पाटील यांनी आज निषेधसभेच्या नावाखाली कवठेमंकाळमध्ये पुन्हा एकदा नौटंकी केली. स्वतःला राज्याचा युवा नेता म्हणून समजणारा हा युवक खरोखरच तेवढा राजकीय दृष्ट परिपक्व आहे का? हा प्रश्न आता जनतेच्या समोर पडला आहे. कारण ज्या व्यक्तीने दहा वर्ष खासदार म्हणून काम केले आहे ,सहा वर्षे विधान परिषदेचे आमदार म्हणून काम पाहिले आहे ,अशी व्यक्तीने एका वयोवृद्ध महिलेला धक्का मारला अशा पद्धतीचा लाजिरवाना आरोप करण्यास त्यांनी आयाज मुल्ला यांच्यावरती दबाव टाकला.खरंतर ज्या माऊलीला किंवा अयाज मुला यांना काकांनी हात देखील लावला नाही हे माहिती असताना सुद्धा,त्या परिस्थितीमध्ये काकांच्यावरतीच आरोप करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत अशा पद्धतीची पोपटपंची पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली ,लोकांना कालही या गोष्टीबद्दल खात्री वाटत नव्हती ,कारण एक जबाबदारी व्यक्ती अशा गोष्टी करत नाहीत यावरती सर्वांचा विश्वास होता. आणि आज ज्यांना आरोप करायला भाग पाडले त्या अयाज मुल्ला यांनीच वस्तुस्थिती स्वतःच्या होशहवास मध्ये स्टॅम्प वरती ऍफिडेवीट करून,नोटरी करून ते त्यांची तक्रार मागे घेऊन दाखवून दिले आहे, की त्यांना हे सर्व दबाव टाकून करण्यास काल भाग पाडले होते. आज तक्रार मिटली आहे,हे माहिती असताना निषेधसभा घेत रोहित पाटील आणि जातीपाती च्या राजकारणात अपघाताने घडलेले खासदार विशाल पाटील यांनी काही अपरिपक वक्तव्य केली आणि मेलेल्या मड्यावरचे सुद्धा लोणी खाण्याचा प्रकार केला. त्या गोष्टींना वेळोवेळी उत्तरे मिळत जातील,परंतु काय खरं?काय खोटं?हे तासगाव कवठेमहांकाळ जनतेसोबतच महाराष्ट्राच्या समोर कालच्या बातम्या पेरल्या गेल्या, त्या कशा उघड्या पडल्या.. हे आजच्या या माघार घेण्याच्या प्रकारावरून आपणास समजून येईल. यापूर्वी देखील ज्या गोष्टी सामोपचाराने सुटत असतात अशा गोष्टींना सुद्धा मीडियासमोर आणून त्याची प्रसिद्ध मिळवण्याचा प्रयत्न नेहमीच केला गेला आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तासगाव कवठेमहांकाळ विधानसभेच्या जनतेची दिशाभूल करण्याचा लाजिरवाणा, केविलवाना प्रकार या बहाद्दरांच्याकडून करण्याचा प्रयत्न झाला त्याला त्यांच्याच कार्यकर्त्यांनी तोंडावर पाडले .फक्त तक्रारच पाठीमागे घेतली नाही.. तर केलेले सर्व आरोप खोटे आहेत ..माजी खासदार संजयकाका पाटील यांचा या प्रकाराशी काही एक संबंध नाही हे त्यांनी एफिडेविट वरती लिहून दिले आहे आणि रोहित पाटील यांनी दबाव टाकत त्यांच्यावरती हे खोटे प्रकार करायला भाग पाडले ..हे त्या अनुषंगाने सिद्ध केले आहे . कवठेमहांकाळ - तासगाव मधील सामान्य जनता अशा गोष्टींना कधीच थारा देऊ शकत नाही. सामाजिक सलोखा-सामाजिक ऐक्य अशा नौटंकी करून बिघडवण्याचा प्रयत्न कालपासून चालू होता.. त्याला आज जोरदार चपराक मिळाली.
वाद मिटला आहे हे लक्षात आल्यानंतर रोहित पाटलांनी आपल्या भाषणातून कार्यकर्त्याला हात लावाल तर गाठ माझ्याशी आहे अशी वक्तव्य केली ... खरच त्यांचा तेवढा आवाका का आहे का?खरे तर अशातून स्वतःची बौद्धिक क्षमता यातून सिद्ध होत असते.. वस्तुस्थितीची माहिती रोहित पाटलांनी तक्रार दाखल करण्याआधीच घेतली असती आणि त्यावरती मार्ग काढण्याचा प्रयत्न केला असता तर.. रोहित पाटलांना नक्कीच सहानुभूती मिळाली असती ,परंतु मिटलेल्या विषयाचे भांडवल करून जबरदस्ती त्यांना तक्रार करायला भाग पाडून ..राजकीय पोळी भाजण्याची संधी आपल्या हातून जाऊ नये ..म्हणून नाही आय्याज मुला याना खोटी तक्रार देण्यास भाग पाडले ...मीडियाला पोलीस स्टेशनला बोलावले आणि एक प्रकारचा पोलिसांच्या वरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला ..परंतु हा महाराष्ट्र आहे ..इथं सत्य लपत नाही आणि हो कवठेमहांकाळची पांढरी ही आई अंबाबाईचीच आहे.. ती महिषासुराचा वध करायला फार वेळ लावत नाही ...एका दिवसात तीने महिषासुराचा वध करून खोटी तक्रार द्यायला भाग पाडणाऱ्यांना त्यांचा खोटा चेहरा जनतेसमोर 24 तासात आणला आहे... खरोखरच कवठेमहांकाळची पांढरी ही जागृत पांढरी आहे ...असल्या खोट्या प्रवृत्तीला कवठेमहांकाळ नव्हे तर तासगावची ही जनता येणाऱ्या काळात कधीच स्वीकारणार नाही ..म्हणून रोहित पाटील बोलताना जरा सबुरीने घ्या... भविष्यात सुद्धा तुमचा तोल सुटला तर तुम्ही प्रत्येक गोष्टीत तोंडावरच पडाल आणि आणि येणारा काळ नक्कीच तुम्हाला याचे उत्तर देईल.
असे जनार्धन पाटील यांनी बोलताना सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post