रोहित आणि विशाल पाटलांना कवठेमंकाळ तासगाव पेटवायचा आहे का ? सुनील जाधव, भारतीय जनता पार्टी तासगांव तालुका अध्यक्ष



 किरकोळ झालेल्या बाचाबाची चे भांडवल करून माजी खासदार संजय काका पाटील यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करायला लावून, सहानुभूती मिळवण्यासाठी स्टंटबाजी करणाऱ्या रोहित पाटील व खासदार विशाल पाटील यांना तासगाव कवठेमंकाळ पेटवायचे आहे का असा प्रश्न तासगाव कवठेमहांकाळ च्या लोकांना पडला आहे 
  कोणत्याही निवडणुकीच्या काळात ताणतणाव हे होत असतात. 24 तास राजकारण करणाऱ्या अंजनी करांना हे चांगलं माहिती आहे. सध्या कवठेमंकाळ नगराध्यक्ष पदाची निवडणूक सुरू आहे. त्यामुळे साहजिकच थोडासा वातावरणात राजकीय तणाव होता त्याचा गैरफायदा घेऊन स्वतःच्या कार्यकर्त्यांना उचकावून भांडणे पेटवायला रोहित पाटलांनी भाग पाडले. त्यानंतरच्या काळात भांडणे मिटवण्यासाठी गेलेल्या काकांना खलनायक ठरवत त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले अगदी 76 वर्षाच्या वृद्ध महिलेवर काकांनी हात उगारल्याची बतावणी करून खोटी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला 
  मात्र अय्याज मुल्ला यांनीच हे सगळे आरोप खोडून काढल्यामुळे रोहित पाटील व विशाल पाटील तोंडघशी पडले आहेत . चार महिन्यांपूर्वीपर्यंत अंजनी करांना शव्या घालणारे विशाल पाटीलांना रोहित पाटील यांचा आता पुळका आला आहे 
 गेल्या वर्षभरापासून रोहित पाटील व सुरेश पाटील यांनी खोटी नौटंकी करत काकांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हात उभारावा अशा प्रकारची बालिश वक्तव्य सुरू ठेवली आहेत 
 बाजार समिती निवडणुकीच्या 200 पेक्षा जास्त गुन्हेगार सूतगिरिनावर एकत्र करून बाजार समिती मतदाना दिवशी भांडण करण्याचा त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाल्याचे तासगावच्या लोकांनी बघितले आहे 
  प्रत्येक गोष्टीत नौटंकी करून खोटी सहानुभूती मिळवण्याचा रोहित पाटलांना छंदच लागला आहे. 
 अय्याज मुल्ला यांच्या घटनेत ते स्वतः सुरुवातीलाच फिर्याद द्यायला तयार नव्हते मात्र तरीही त्यांच्या वरती दबाव टाकून त्यांना खोटी फिर्याद देण्यास भाग पाडण्यात आलं. त्यानंतर स्टंटबाजी करायला तासगाव तालुक्यातील लोकं नेऊन सभा घेतली या सभेत रोहित पाटील व विशाल पाटील यांनी प्रक्षोभक भाषणे केली यावेळी माजी खासदार व त्यांच्या कार्यकर्त्यांना कुत्र्याची उपमा देण्यापर्यंत यांची मजल गेली . जेणेकरून संजय काका समर्थकांनी आक्रमक होऊन काहीतरी करावे. त्यातून एखादा प्रसंग घडला तर पुन्हा रडा रड करून सहानभूती मिळवायला हे रिकामेच कारण गेली दहा वर्ष लोकांना सांगण्यासारखं एकही काम मतदार संघात उभं केलेले नाही त्यामुळे सहानुभूतीच्या जीवावरच निवडणूक लढवण्याचा यांचा जुना धंदा आहे  

रोहित पाटील मंत्री होणार आहेत असे विशाल पाटील म्हणाले मात्र लोकप्रतिनिधी होण्यासाठी लागणारी राजकीय समज व सामाजिक परिपक्वता बालिश रोहित पाटलांच्या दिसून येत नाही  

अय्याज मुल्ला या प्रकरणावरून तासगाव कवठेमंकाळ तालुक्यातील नागरिकांनी धडा घेणे गरजेचे आहे. यांचे राजकारण होईल पण लोकांचे जीव जातील विशेषता रोहित पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी ही जागरूक राहणे जास्त गरजेचे आहे . कारण कार्यकर्त्याच्या पाठीशी कोणत्याही प्रसंगात ठामपणे उभा रहायला त्यांच्याकडे संजयकाका नाहीत
असे सुनील जाधव यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post