इस्लामपूर : प्रतिनिधी
एकाचे चार कारखाने होत असताना या मतदार संघात शेतकऱ्याला विकासापासुन जाणीवपुर्वक दुर ठेवले,३५ वर्षात पाणंद रस्ते दर्जेदार विकसित होणे आवश्यक होते,मात्र शेतकरी हा कायम चिताग्रस्त राहीला पाहीजे अशी खबरदारी आमदारांनी घेतली हे दुर्देवी आहे.असे मत सांगली जिल्हा भाजपाचे अध्यक्ष व २८३ इस्लामपुर विधानसभा निवडणुक प्रमुख निशिकांत भोसले- पाटील (दादा) यांनी व्यक्त केले.
बावची येथे ७ कोटी ८० लाख ८४ हजार तर
कोरेगाव येथे १ कोटी ८ लाख व गोटखिंडी येथे ८१ लाख रुपये निधीतून विविध विकास कामांच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपा इस्लामपुर विधानसभा संयोजक प्रसाद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे,युवा मोर्चा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, तालुकाध्यक्ष निवास पाटील, महिला आघाडी अध्यक्षा सुरेखाताई जगताप, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रवीण माने, संघटन सरचिटणीस संदीप सावंत, दादासाहेब रसाळ, ओबीसी मोर्चा अध्यक्ष मधुकर हुबाले, यदुराज थोरात प्रमुख उपस्थित होते.
निशिकांत भोसले-पाटील (दादा) म्हणाले,
येथील शेतकरी ऊस पिकवतो म्हणून आज वाळवा तालुक्यातील साखर कारखानदारी उभी आहे. एककीकडे एकाचे चार कारखाने झाले. तर दुसरीकडे शेतकऱ्यांची प्रगती खुंटली. याला येथील विद्यमान आमदार कारणीभूत आहेत. त्यांनी इतके वर्षे आमदार आणि राज्य मंत्रिमंडळात महत्वाची पदे भूषवली आहेत. परंतु त्यांना त्यांच्या मतदार संघातील पाणंद रस्त्यांचा प्रश्न निकाली काढता आला नाही.कारण इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील पाणंद रस्त्यांची अवस्था जैसे थे आहे. शेतकऱ्यांना या रस्त्यांवरून ये-जा करताना, खते, धान्य, आदींची वाहतूक करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. हे येथील शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे. कारखान्याचे अधिकारी जरवर्षी फक्त ऊस मागायला येतात. वाहतुकीचा व रस्त्यांचा विषय काढला की वेगवेगळ्या प्रकारे उत्तरे शेतकऱ्यांना ऐकुण जातात,ऊसाची अडवणूक केली जाते, ही येथील वस्तुस्थिती आहे. या साऱ्या त्रासातून तुम्हाला मुक्त व्हायचे असेल तर स्वाभीमाने पुढे येऊन येथील राजकीय व्यवस्था बदलण्याची गरज आहे. महायुती सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेत आहे. हेच सरकार तुमचा आगामी काळात विकास साधेल .
यावेळी बावची येथे वाळवा तालुका भाजपा कोषाध्यक्ष रणजित माने, युवा मोर्चा संघटन सरचिटणीस विश्वजित पाटील, ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष विक्रांत गुरव, शैलजाताई खोत, पोपट सुतार, संतोष जाधव, प्रशांत पाटील, सचिन पाटील, रोहित सुतार, मधुकर खाडे, राजेंद्र राणे, आकाश पाटील, रवींद्र पोखरणिकर, रमेश पाटील, संतोष यादव, करण कोकाटे, वैभव पाटील, जगन्नाथ भोसले, प्रवीण पाटील, अविनाश कांबळे तर कोरेगाव येथे वाळवा तालुका उपाध्यक्ष गजानन पाटील, अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष वाहिद मुजावर, कोरेगाव भाजपा अध्यक्ष दीपक पाटील, रंगराव पाटील, रसूल मुजावर, राजाराम पाटील, शरद पाटील, डॉ.संभाजी तळप, अधिकराव पाटील, रवींद्र कर्वे, प्रकाश देसाई, शलिक मुजावर, शीतल कर्वे, रामचंद्र जंगम, चंद्रकांत पाटील, अभिजित पाटील, ओंकार पाटील, अशिकेत पाटील व गोटखिंडी येथे हुतात्मा दूध संघ उपाध्यक्ष भगवानराव पाटील भाऊ, माजी उपसरपंच नंदकुमार पाटील, दादासाहेब पाटील, अभिजित घारे, माजी संचालक हुतात्मा बँक ए.आर.थोरात, हनमंतराव पाटील, के.व्ही.भोईटे, अरविंद पाटील, महादेव घारे, प्रकाश पाटील, दीपक थोरात, ज्ञानदेव साळुंखे, अशोकराव पाटील, अतिश जाधव, निवृत्ती एरंडोलकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवकांची पोटतिडीक
पाणंद रस्त्याच्या शुभारंभ प्रसंगी अनेक युवक ग्रामपंचायत मधील भ्रष्टकारभार,हुकुमशाही,शेतकर्यांची पिळवणुक,जाणीवपुर्वक देत असलेल्या त्रासाबद्दल मनोगतातुन आवाज उठवत आहेत,यावर निशिकांतदादांनी तुम्ही साथ द्या तुमच्या केसाला व स्वाभीमानाला धक्का लागणार नाही याची जबाबदारी मी घेतो.असा विश्वास दिला यावेळी टाळ्या व शेट्ट्याचा कडकडाट झाला.
Tags
इस्लामपूर प्रतिनिधी