महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन समारंभ आनंदात साजरे केले जावेत या हेतूने प्रत्येक सणाच्या वेळी आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महत्त्वाच्या सणांच्या निमित्ताने या शिध्याचे वाटपही करण्यात येत होते परंतु गणपती उत्सवाच्या वेळी हा आनंदाचा शिधा योग्य वेळी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे .
श्री गणेश उत्सवाचे अवघे तीन ते चारच दिवस राहिले असतानाही अजून हा आनंदाचा शिधा लोकांपर्यंत पोहोचलेला नाही .शिवाय या शिध्यामध्ये ज्या वस्तू पुरवल्या जातात त्यांच्यामध्ये कपातही करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे .त्यामुळे सदर शिधा हा पूर्ण देण्यात यावा अशी मागणी लोकहित मंचच्या वतीने अध्यक्ष मनोज भिसे यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे
Tags
सांगली प्रतिनिधी