इस्लामपुर मतदार संघातील आमदारांच्याकडुन जनतेच्या पदरी निराशाच - निशिकांत भोसले-पाटील

 मिरजवाडी, मौजे डिग्रज येथे विविध विकास कामांचा शुभारंभ

इस्लामपूर : प्रतिनिधी
गेल्या ३५ वर्षात इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील असमाधानकारक झालेला विकास व प्रलंबीत असलेले मुलभुत प्रश्न यामुळे या मतदार संघातील जनतेच्या पदरी निराशाच आहे,हि परिस्थिती बदलायची असेल तर मतदारांनी या निवडणुकीत भाकरी पुर्ण करपुन जाण्याआधी परतली पाहिजे आणि हिच ती संधी आहे, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांनी केली.

मिरजवाडी येथे १ कोटी ८ लाख ७६ हजार रुपये व मौजे डिग्रज येथे ४५ लाख रुपये निधीतून विविध विकास कामांच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपा इस्लामपूर विधानसभा संयोजक प्रसाद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे, युवा मोर्चा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, तालुकाध्यक्ष निवास पाटील, महिला आघाडी अध्यक्षा सुरेखाताई जगताप, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रवीण माने, संघटन सरचिटणीस संदीप सावंत, दादासाहेब रसाळ, ओबीसी मोर्चा अध्यक्ष मधुकर हुबाले, यदुराज थोरात प्रमुख उपस्थित होते.

निशिकांत भोसले-पाटील (दादा) म्हणाले, २००९ पासून तुम्हाला जो ऊसतोडीचा, घराघरात भांडणे लावण्याचा जो त्रास होतोय, त्याच एकच कारण आहे, ते म्हणजे अनेक वर्षे एकाच माणसाच्या हाती तुम्ही दिलेली सत्ता. त्यामुळे त्यांचा एकाधिकारशाही पणा सुरू आहे. ही ताकद कोठून आली तर ती तुमच्या मतामधून आली आहे. यावेळी येथील सत्तेची व्यवस्था बदलायला हवी, त्यानंतर तुम्हाला नक्कीच बदल घडलेला दिसून येईल. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मला आशीर्वाद द्या. 

यावेळी मिरजवाडी येथे सरपंच जयश्रीताई साळुंखे, भास्कर मोरे, सयाजीराव जाधव, दीपक पाटील, अनिल साळुंखे, जयसिंग नांगरे पाटील, दिगंबर ठाणेकर, अनिल सरदेशमुख, निशिकांत साळुंखे, राजेंद्र माने, मिरजवाडी भाजपा अध्यक्ष माणिक माने, निलेश साळुंखे, धनाजी पाटील, सूरज पाटील, ऋषिकेश जाधव, शशांक माने, पोपट बोते तर सांगली कृषी बाजार समितीचे माजी संचालक कुमार पाटील, अजित लांडे, भाजपाचे कार्यकारणी सदस्य नाथगोंडा पाटील, मौजे डिग्रजचे अध्यक्ष माणिक आवटी, प्रकाश हॉस्पिटलचे मानद संचालक विजय शिंदे, संदीप पाटील, मिलिंद सिसाळ, सुरेंद्र कांबळे, प्रकाश कोळी, अशोक पाटील, दादासो पाटील, सुभाष पाटील, सागर आंबोळे, ओंकार काटे, दिलीप शिकलगार, संजय साळुंखे, वसू कोलार, आण्णाप्पा वजवळकर, सुरज पवार, भूपाल देवराये, अनिल खटके, रामंचद आंबोळे, जयकुमार पाटील, अरूण लांडे, दिलीप पाटील म्हाळव, संजय आबा साळुंखे, आनंदा शेरेकर, जयपाल बिरनाळे, आण्णासाहेव कुरणे, रमेश मस्के, नागेश श्रीरंबेकर, दादू पाटील म्हाळव, हिंदुराव शेरेकर, सुनील सावंत यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'सर्वोदय'च काय?
दरम्यान, पाणंद रस्त्याच्या उदघाटन कार्यक्रमात निशिकांतदादांचे भाषण सुरू असताना उपस्थित शेतकऱ्यांनी दादांना सर्वोदय कारखान्यावर बोलण्याची विनंती केली. यावेळी दादा म्हणाले, मी आरोग्य क्षेत्रात काम करणारा माणूस आहे. कारखान्याबद्दल तुमच्यासारख्या हाजारो शेतकर्‍यांच्या मनाला होणाऱ्या वेदना याची मला जाणीव आहे. वेदनावर फुंकर घालण्यासाठी मला परमेश्वाराने ताकद दिली आहे. येथील राजकीय सत्ता व्यवस्था बदलुया,तुमच्यासारख्या अनेकांच्या वेदना कायमस्वरुपी संपतील.यावर उपस्थित शेतकऱ्यांनी हात वर करत दादा आम्ही तुमच्या सोबत असल्याचे सांगितले

Post a Comment

Previous Post Next Post