सांगलीचा आवाज संसदेत घुमू लागला........
गेले काही वर्षात दिल्लीच्या संसदेत सांगलीचा आवाज फारसा दिसून येत नव्हता खासदार विशाल पाटील यांच्या रूपाने आता तो घुमू लागला आहे . त्याच्यामुळे जिल्ह्यातील राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा होईल विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा जिल्ह्यातील जनतेची वाढलेली आहे
राज्यातील लोकसभा निवडणुकीत यंदा लक्षनिय लोकसभा मतदारसंघ ठरला तो सांगलीचा . राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातवाने इच्छा जाहीर करूनही काँग्रेसला ही जागा सुटली नाही त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला आली . तर महाविकास आघाडीने ठाकरे गटाकडून पैलवान चंद्रहार पाटील यांच्या निवडणुकीत रिंगणात उतरवण्यात आले काँग्रेसकडून तयारी केलेल्या आणि इच्छुक असलेल्या विशाल पाटील यादी बंडखोरी करत अपक्ष लोक सभा निवडणूक लढवली आणि ती जिंकली ही त्यामुळेच ही निवडणूक देशांमध्ये चर्चेचा विषय झाली होती.
निवडणूक संपताच लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सर्वच खासदार दिल्लीत पोहोचले होते खासदार पाटील यांचे पहिलेच भाषण संसदेत जोरदार गाजले खासदार पाटील यांनी पहिलेच भाषण मराठी ,हिंदी, इंग्रजी अशा भाषांचा प्रभावी वापर करून केला त्याचबरोबर सांगली कोल्हापूर जिल्हा चा महापुराचा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला.
जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवणे ,देशाच्या हिताचे कायदे ,करणे हे मुख्य काम खासदारांचे असते आणि खासदारांकडून ते काम व त्यांना पाठपुरावा दिसत नाही आता मात्र खासदार विशाल पाटील यांचे रूपाने सांगलीचा आवाज संसदेत घूमू लागलेला आहे सांगलीचे विमानतळ असो ड्रायपोर्ट रस्ते सिंचन योजना प्रक्रिया उद्योग बाजारपेठेला चालना आधी महत्त्वाचे प्रश्न सोडवले जाण्याचे अपेक्षा जनतेकडून विशाल दादां यांना करण्यात येत आहे .
वसंतदादा यांनी एक काळ राज्याचे नेतृत्व केले होते केंद्राच्या नेतृत्वाला वसंतदादांच्या कामाची योजनांची दखल घ्यावी लागली तो गुण विशाल पाटील यांच्याकडे आला आहे ते खासदारकीच्या माध्यमातून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतील अशी आशा आहे.
Tags
वाढदिवस विशेष