राणी सरस्वती कन्याशा परिसरामध्ये नागरिकांचा वावर खूप मोठ्या प्रमाणात असून त्या परिसरामध्ये गणपती पेठ, कापड पेठ, सराफ कट्टा, जुनी भाजी मंडई, भुसार पेठ अशा मोठ्या बाजारपेठ असल्यामुळे हा शहरातला गजबजलेला भाग आहे. या परिसरामध्ये दररोज महिला, पुरुष, शालेय विद्यार्थी यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. महिला व पुरुष यांना या भागात नैसर्गिक विधी करण्यासाठी मुतारीची बिलकुल सोय नाही. त्यामुळे उघड्यावर नैसर्गिक विधी नागरिक करतात. महापालिकेने जुनी मुतारी काढल्यामुळे पुरुष उघड्यावरच लघवी करतात. पूर्वीच्या ठिकाणी नवीन मुतारी बांधणे तसेच तसेच महापालिकेची कचराकुंडी तिथेच आहे. उघड्यावर लघवी केल्यामुळे आणि कचराकुंडी असल्यामुळे रोगराई मोठ्या प्रमाणात पसरत आहे. या सर्व गोष्टींचा नागरिकांना तेथील दुकानदारांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. तरी आपण या गोष्टीकडे गंभीरपणे पहावी व योग्य ती उपाययोजना करावी. योग्य ती दखल न घेतल्यास मा. मदनभाऊ पाटील युवा मंच कडून तीव्र आंदोलन करण्यात येईल.
यावेळी मदनभाऊ पाटील युवा मंच महापालिका क्षेत्र अध्यक्ष हाजीतोपिक बिडीवाले, कय्युम पटवेकर, अवधूत गवळी, अशोक शहा, विजय सकपाळे, चंद्रकांत लांडगे, दीपक कांबळे, औदुंबर टेके, आजीज तांबोळी, राहुल लाडगे, सुहास बेलकर, संतोष गार्डी, मुसा बागवान, अण्णासो पाटील आदी उपस्थित होती.