लातूर जिल्ह्याचेसुपुत्र तथा भारतीय जनता पार्टीचेमाजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊन आपल्या अभ्यासूवृत्ती, कुशल संघटन कौशल्य,
जिद्द आणि चिकाटीच्या बळावर जीवनातील चढ-उतार पार करीत यशाचे उत्तुंग शिखर गाठलेआहे.सर्वसामान्य जनतेला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सातत्यानेसंघर्ष केला.
सामान्य कुटुंबात जन्म घेऊन उच्च विद्या विभूषित झालेलेडॉ सुनील गायकवाड यांनी स्व, लोकनेतेगोपीनाथराव मुंडेयांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनतापार्टीत आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात के ली, देशाचेपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर लोकसभा मतदारसंघातून 2014 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत सुमारेअडीच लाखापेक्षा अधिक मताधिक्यानेघवघवीत यश संपादन केले.
डॉ सुनील गायकवाड यांच्या रूपान लातूर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचा उच्चशिक्षीत लोकसभा सदस्य मिळाला.
सासंदीय कामकाज प्रसंगी 97 टक्के उपस्थिती लावून लातूर लोकसभा मतदार संघातील विकास कामाचेप्रश्न सभागृहात उपस्थित करून जिल्ह्याच्या विकासाला चालना दिली, लोकसभेमध्येआपल्या अभ्यासूवृत्तीमुळेत्यांनी वेगळा ठसा उमटविला,
जिल्ह्यातील रस्ते, औद्योगिकरण ,सिंचन, रेल्वे, शिक्षण ,पर्यावरण तसेच कला क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील विकासाला त्यांनी मोठी चालना दिलीआहे. 2015 2015साली भीषणपाणी टंचाई असताना लातूर शहराला रेल्वेने
पाणी आणण्याचा इतिहास रचला, एक कु शल संघटक, वक्ता हाडाचा पत्रकार आणि तळागाळातील जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करणारा सामान्य जनतेत समरस होऊन काम करणारा कार्यकर्ताम्हणून संपूर्णलातूर लोकसभा
मतदारसंघानेत्यांच्यावर विश्वास आणि जबाबदारी दिली. जनतेच्या विश्वासाला पात्र राहून दिलेल्या शब्दाला जागणारा हा नेता आपल्या वक्तृत्व, कर्तुत्व आणि नेतृत्व गुणांच्या बळावर लोकसभेच्या सभागृहात सर्वांचा चाहता झाला
आकाश मोहिते,सांगली
Tags
लातूर प्रतिनिधी