मोदीजींची विकासाची गॅरंटी आणि सांगली जिल्ह्यातील कामे हीच संजयकाका पाटील यांच्या विजयाची गॅरंटी : भागवत कराड

मिरज प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली विकासाची गॅरंटी आणि सांगली जिल्ह्यात केलेली विकास कामे हीच संजयकाका पाटील यांच्या विजयाची गॅरंटी आहे, असे मत
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी व्यक्त केले. काका तुम्ही जिंकणार आहात असा विश्वास ही त्यांनी बोलून दाखवीला.
सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी भागवत कराड यांची मिरज येथे भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी ज्येष्ठ नेते दिपकबाबा शिंदे म्हैसाळकर, आमदार गोपीचंद पडळकर, सांगली जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष पप्पू डोंगरे उपस्थित होते.
भागवत कराड म्हणाले, मोदी सरकारचे शिलेदार बनून जिल्ह्यात केलेल्या अविरत विकास कामांमुळे सांगलीची जनता प्रचंड मोठ्या मताधिक्याने आपल्याला निवडून देईल. मोदीजींच्या गॅरंटीवर जनतेचा विश्वास आहे. विकसित सांगलीच्या गॅरंटीसाठी सामान्य जनता आपल्या साथीला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मी मतदारसंघातील प्रचार व विकास कामे आणि निवडणूक संदर्भात काही बाबींचा आढावा घेतला आहे. वातावरणात खूप चांगले आहे. विकास कामांवर जनता खूश आहे. त्यामुळे मोठ्या मताधिक्याने विजय होणार आहे. 
यावेळी निवडणूक, भाजपा महायुतीचे समावेश असणारे पक्ष, नेते, कार्यकर्ते यांच्या भूमिका, निवडणुकीतील सहभाग अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. अनेक विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले.

Post a Comment

Previous Post Next Post