मा. आ. पृथ्वीराज (बाबा) देशमुख बाबा यांच्या ठाई असलेल्या चैतन्य दूरदृष्टी आणि नेतृत्वगुण या विषयी त्यांच्या विविध पातळीवर सन्मान झाला आहे. त्यांची प्रगतशील विचारसरणी, धोरणीपणा, सर्व स्थितीतील
घडामोडींचा त्यांना असलेले भान. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील बहुश्रुतता अनेकदा आम्ही सतत संपर्कात असल्याने जाणवते. या सर्व
गुणांमुळे पृथ्वीराजबाबा यांचे व्यक्तिमत्त्व उत्तुंग झाले आहे. त्यांचे कार्य धडाडीचे आहे. सामाजिक प्रश्नावर ते तळमळीने काम करतात. सांगली जिल्ह्यातील पाणी योजनांसाठी त्यांची धडपड आम्ही पाहिलेली आहे. विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी समाजपरिवर्तनाचे कार्य गतीने सुरू ठेवले आहे. त्यांना सर्वप्रथम कडेगाव तालुक्यासह सोनहिरा खोर्यातील सर्व जनतेच्यावतीने आणि आमच्या कुटुंबाच्यावतीने मनापासून शुभेच्छा देतो. राजकारणाने हल्ली खूपच वेगळे रूप धारण केले आहे. नवी पिढी मोठ्या प्रमाणात सक्रिय होत आहे. नव्या पिढीच्या राजकारणाविषयी अपेक्षा वाढल्या आहे. त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहेत. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उत्तम कार्य कसे करता येईल, याचे मार्गदर्शन देण्याचे महत्त्वाचे कार्य पृथ्वीराजबाबा हे करीत आहेत. त्यांच्या शब्दाला नवी पिढी साद देत आहे. अभ्यास, अनुभवी, कुशल, कार्यक्षम, संवेदनशील आणि दूरदृष्टी असलेले त्यांचे नेतृत्व आहे. युवकांच्या आणि समाजातील शेवटच्या स्तरातील लोकांसाठी ते सतत परिश्रम घेत असतात. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी विविध संस्थांचे जाळे निर्माण केले आहे. राजकीयदृष्ट्या त्यांना
मोठा संघर्ष करावा लागत आहे. अशा परिस्थितीतही त्यांची खंबीर राहण्याची वृत्ती अढळ असते. पश्चिम महाराष्ट्र हा सधन समजला जात असला तरी तिथेही बरेच प्रश्न आहेत. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, कडेगाव या सारख्या भागात प्रत्येक वर्षी दुष्काळ असतो. शेतीच्या
मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. या सर्व समस्या लक्षात घेणे, यांचा अभ्यास करणे, त्याच्यावर पर्याय शोधणे आणि या भागात विकास करत असताना विकासाच्या समन्वय साधणे हे काम महत्त्वाचे म्हणजेच
मोठे शिवधनुष्यच आहे. या समस्यांवर मात करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातील प्रमुख नेत्यांनी
मिळून प्रयत्न केले. यात पृथ्वीराजबाबा यांचे मोठे योगदान आहे. दुष्काळ प्रश्नावर पोटतिडकीने ते भूमिका
मांडत असतात. मोठ्या प्रमाणावर लोकसंग्रह आणि कार्यकर्त्यांची फळी त्यांच्यासोबत आहे. राजकारणात राहूनही कोणत्याही पदाचा मोह न ठेवणारा, आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहणारा, स्वच्छ प्रतिमेचा आणि समाजाच्या विकासासाठी कार्यकर्त्यांची फळी अहोरात्र उभी करणारे आमचे लाडके बाबा हे सर्वसामान्य नेतृत्व ठरले आहे. त्यांच्या कार्याचा, विचारांचा आदर्श समोर ठेवून कार्यकर्त्यांची एक मोठी फळी समाजपरिवर्तनाच्या कार्यात सक्रिय आहे. युवा पिढीला त्यांचे कार्य दिशादर्शक व मार्गदर्शक ठरले आहे. कारण ते समाजातील गरीब, दीनदुबळ्या, असहाय्य, सामाजिक अन्यायग्रस्त लोकांच्या मागे खंबीरपणे ऊभे राहून त्यांना मदत करुन त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम ते अहोरात्र आणि नित्यनियमाने करत आहेत.
लोकांची ग्रामपंचायत, तलाठी, मंडल अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी तसेच पोलीस स्टेशन, विद्युत महामंडळ, पंचायत समिती, जिल्हा परिषद, पाटबंधारे विभाग, वन विभाग, कृषी विभाग, भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा प्रशासकीय कामांसाठी लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी रोज सकाळी नियमितपणे लोक त्यांच्या समोर आपली गार्हाणी घेऊन येतात. आठवड्यातील पहिला दिवस म्हणजे प्रत्येक सोमवारी ते या लोकांच्या प्रश्नांसाठी प्रत्येक विभागाच्या कार्यालयात जाऊन लोकांचे प्रश्न मार्गी लावतात. तसेच त्यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्यही खूप मोठे आहे. मोठ्या आजारावर उपचार कोठे करायचे, पैसे नसतील तर शासकीय योजनेतून तसेच विविध सामाजिक न्यास संस्थेच्या माध्यमातून पैसे उपलब्ध करून रुग्णाला रुग्णालयात दाखल करुन त्याच्यावर उपचार करुन घरी आणणे हे तर जणू त्यांना आपले कर्तव्यचं वाटते. अनाथ, विधवा, वयोवृद्ध, अपंग, अत्याचारीत लोकांना व महिलांना पेंशन मिळवून देण्यासाठी सतत त्यांची धडपड सुरू असते. प्रत्येक वेळी न्यायाच्या बाजूने खंबीरपणे ऊभे राहून अन्याय होणार्याला न्याय मिळवून देणे हाच त्यांचा धर्म आहे. आणि म्हणूनच की काय त्यांचे माझ्यासारखे असंख्य सर्वसामान्य कार्यकर्ते त्यांच्या या महान कार्य पूर्ण होण्यासाठी समाजात सतत कार्यरत असतात. भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर सांगली जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. या
लोकांची ग्रामपंचायत, तलाठी, मंडल अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी तसेच पोलीस स्टेशन, विद्युत महामंडळ, पंचायत समिती, जिल्हा परिषद, पाटबंधारे विभाग, वन विभाग, कृषी विभाग, भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा प्रशासकीय कामांसाठी लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी रोज सकाळी नियमितपणे लोक त्यांच्या समोर आपली गार्हाणी घेऊन येतात. आठवड्यातील पहिला दिवस म्हणजे प्रत्येक सोमवारी ते या लोकांच्या प्रश्नांसाठी प्रत्येक विभागाच्या कार्यालयात जाऊन लोकांचे प्रश्न मार्गी लावतात. तसेच त्यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्यही खूप मोठे आहे. मोठ्या आजारावर उपचार कोठे करायचे, पैसे नसतील तर शासकीय योजनेतून तसेच विविध सामाजिक न्यास संस्थेच्या माध्यमातून पैसे उपलब्ध करून रुग्णाला रुग्णालयात दाखल करुन त्याच्यावर उपचार करुन घरी आणणे हे तर जणू त्यांना आपले कर्तव्यचं वाटते. अनाथ, विधवा, वयोवृद्ध, अपंग, अत्याचारीत लोकांना व महिलांना पेंशन मिळवून देण्यासाठी सतत त्यांची धडपड सुरू असते. प्रत्येक वेळी न्यायाच्या बाजूने खंबीरपणे ऊभे राहून अन्याय होणार्याला न्याय मिळवून देणे हाच त्यांचा धर्म आहे. आणि म्हणूनच की काय त्यांचे माझ्यासारखे असंख्य सर्वसामान्य कार्यकर्ते त्यांच्या या महान कार्य पूर्ण होण्यासाठी समाजात सतत कार्यरत असतात. भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर सांगली जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. या
माध्यमातून जिल्ह्यातील वाडी-वस्त्यांपर्यंत पक्षाचे विचार पोहोचविले. पक्षाची शक्ती वाढण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. त्याचे त्यांना यशही मिळाले. समाजकारण आणि राजकारण करताना त्यांनी धनाढ्य, मातब्बर विरोधकांशी दोन हात केले आहेत. साखर कारखाना, सूतगिरणी, शिक्षण संस्था त्यांनी उभारल्या आहेत. अॅड. आ. संपतराव
देशमुख यांच्या निधनानंतर पृथ्वीराजबाबाीं त्यांचा वारसा समर्थपणे सांभाळला आहे. म्हणूनच आम्हां सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे दैवत पृथ्वीराजबाबा देशमुख यांंना आयुरारोग्य लाभो, उदंड आयुष्य लाभो, हीच त्यांच्या वाढदिनी मनापासून शुभेच्छा!
मा. आमदार पृथ्वीराज देशमुख बाबा यांच्या ठायी असलेल्या चैतन्य, दूरदृष्टी आणि नेतृत्वगुण याविषयी त्यांचा विविध पातळीवर सन्मान झाला आहे. त्यांची प्रगतशील विचारसरणी, धोरणीपणा, सर्व स्थितीतील
घडामोडींचे त्यांना असलेले भान, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील बहुश्रुतता अनेकदा आम्ही सतत संपर्कात असल्याने जाणवते. या सर्व गुणांमुळे पृथ्वीराजबाबा यांचे व्यक्तिमत्त्व उत्तुंग बनले आहे. त्यांचे कार्य धडाडीचे आहे. सामाजिक, राजकीय प्रश्नावर ते तळमळीने काम करतात. सांगली जिल्ह्यातील पाणी योजनांसाठी त्यांची धडपड आम्ही पाहिलेली आहे. विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी समाजपरिवर्तनाचे कार्य गतीने सुरू ठेवले आहे. त्यांना सर्वप्रथम सोनहिरा खोर्यातील सर्व जनतेच्यावतीने आणि आमच्या महाडीक कुटुंबाच्यावतीने मनापासून शुभेच्छा देतो.
राजकारणाने हल्ली खूपच वेगळे रूप धारण केले आहे. नवी पिढी मोठ्या प्रमाणात सक्रिय होत आहे. नव्या पिढीच्या राजकारणाविषयी अपेक्षा वाढल्या आहे. त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उत्तम कार्य कसे करता येईल, याचे मार्गदर्शन देण्याचे
महत्त्वाचे कार्य पृथ्वीराज बाबा हे करीत आहेत. त्यांच्या शब्दाला नवी पिढी साद देत आहे. अभ्यास, अनुभवी, कुशल, कार्यक्षम, संवेदनशील आणि दूरदृष्टी असलेले त्यांचे नेतृत्व आहे. युवकांच्या आणि समाजातील शेवटच्या स्तरातील लोकांसाठी ते सतत परिश्रम घेत असतात. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी विविध संस्थांचे जाळे निर्माण केले आहे. राजकीयदृष्ट्या त्यांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. अशा परिस्थितीतही त्यांची खंबीर राहण्याची वृत्ती अढळ असते.
पश्चिम महाराष्ट्र हा सधन समजला जात असला तरी, तिथेही बरेच प्रश्न आहेत. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, कडेगाव यासारख्या भागात प्रत्येक वर्षी दुष्काळ असतो. शेतीच्या मोठ्या प्रमाणात समस्या इथे आहेत. या सर्व समस्या लक्षात घेणे, त्यांचा अभ्यास करणे, त्यावर पर्याय शोधणे आणि या भागात विकास करत असताना विकासाचा समन्वय साधणे हे काम महत्त्वाचे, म्हणजेच मोठे शिवधनुष्यच आहे. या समस्यांवर मात करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातील प्रमुख नेत्यांनी मिळून प्रयत्न केले. यात पृथ्वीराज बाबा यांचे मोठे योगदान आहे. दुष्काळी प्रश्नावर पोटतिडकीने ते भूमिका मांडत असतात. त्यांनी दुष्काळी प्रश्नाबाबत आत्मविश्वासाने काम केले आहे. मोठ्या प्रमाणावर लोकसंग्रह आणि कार्यकर्त्यांची फळी त्यांच्यासोबत आहे.
राजकारणात राहूनही कोणत्याही पदाचा मोह न ठेवणारे, आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहणारे, स्वच्छ प्रतिमेचे आणि समाजाच्या विकासासाठी कार्यकर्त्यांची फळी अहोरात्र उभी करणारे आमचे लाडके बाबा हे सर्वसामान्य नेतृत्व ठरले आहे. त्यांच्या कार्याचा, विचारांचा आदर्श समोर ठेवून कार्यकर्त्यांची एक मोठी फळी समाजपरिवर्तनाच्या कार्यात सक्रिय आहे. युवा पिढीला त्यांचे कार्य दिशादर्शक व मार्गदर्शक ठरले आहे. भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर सांगली जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. या माध्यमातून जिल्ह्यातील वाडी-वस्त्यांपर्यंत पक्षाचे विचार पोहोचविले. पक्षाची शक्ती वाढण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केलेले दिसून येतात.समाजकारण आणि राजकारण करताना त्यांनी धनाढ्य, मातब्बर विरोधकांशी दोनहात केले आहेत. साखर कारखाना, सूतगिरणी, शिक्षण संस्था त्यांनी उभारल्या आहेत. अॅड. आ. संपतराव देशमुख यांच्या निधनानंतर आ. पृथ्वीराज (बाबा) यांनी त्यांचा वारसा समर्थपणे सांभाळला आहे. म्हणूनच सांगली जिल्ह्यातील कर्तबगार व संयमी नेतृत्व माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांना आयुरारोग्य लाभो आणि उदंड आयुष्य लाभो, हीच त्यांच्या वाढदिनी मन:पूर्वक शुभेच्छा, मन:पूर्वक अभीष्टचिंतन... !
Tags
वाढदिवस विशेष