इस्लामपूर : प्रतिनिधी
विरोधकांनी आपलं आयुष्यच लबाडी, विश्वासघात, कपटकारस्थान, ढोंगीपणा व दुसऱ्यांना कमी लेखण्यात घालवले आहे. ते स्वतः निष्क्रीय असून ते विकासकामांवर न बोलता राज्यभर सर्वांना निष्ठेचे तत्त्वज्ञान शिकवत सुटले आहेत अविचाराने मतदार संघाचे मोठे नुकसान झाले आहे,मतदार आता या त्यांना धडा शिकवतील असे मत इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांनी व्यक्त केले.
इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील मौजे डिग्रज येथे प्रचार सभे दरम्यान ते बोलत होते. यावेळी निवास पाटील, सागर मलगुंडे,निशिकांत शेटे महाराज, संदीप सावंत, वीरेंद्र राजमाने, कुमार पाटील, अजित लांडे, दिलीप पाटील, विष्णू चव्हाण, सुरेंद्र कांबळे, मिलिंद सिसाळ, बापूसो सिसाळ, माणिक आवटी प्रमुख उपस्थित होते.
निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, आम्ही विरोधकांना त्यांनी त्यांच्या ३५ वर्षाच्या कालावधीत केलेल्या कामाचा हिशेब मागत असताना त्याचे उत्तर द्यायचे सोडून ते महायुती सरकारवर बेताल आरोप करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आपले सर्वच आयुष्य लबाड बोलण्यात खर्ची घातले आहे. जनतेला त्यांच्या लबाडीची चांगलीच माहिती आहे. २००९ पासून तुम्हाला जो ऊसतोडीचा, घराघरात भांडणे लावण्याचा जो त्रास होतोय, त्याच एकच कारण आहे, ते म्हणजे तुम्ही अनेक वर्षे एकाच माणसाच्या हाती दिलेली सत्ता आहे. त्यामुळे त्यांचा एकाधिकारशाही पणा सुरू आहे. ही ताकद कोठून आली तर ती तुमच्या मतामधून आली आहे. त्यामुळे आता बदल घडवा. त्यानंतर तुम्हाला नक्कीच बदल घडलेला दिसून येईल.
यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तुमच्या वेदना कायमस्वरूपी संपवू....
सर्वोदय कारखान्याबद्दल तुमच्यासारख्या हाजारो शेतकर्यांच्या मनाला होणाऱ्या वेदनांची मला जाणीव आहे. मी आरोग्य क्षेत्रात काम करणारा माणूस आहे. वेदनांवर फुंकर घालण्यासाठी मला परमेश्वाराने ताकद दिली आहे. येथील राजकीय सत्ता व्यवस्था तुम्ही बदला. मी तुमच्या वेदना कायमस्वरुपी संपवेन, असा विश्वास निशिकांत भोसले-पाटील यांनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांना दिला.