ग्रामस्थांच्या पाठिंबामुळेच अंकलीमध्ये कायापालट - सुधीर गाडगीळ


सांगली, दि. १२ : ग्रामस्थ, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांच्या भक्कम पाठबळामुळेच गेल्या दहा वर्षात आपण अंकली गावाचा कायापालट करू शकलो. यापुढेही अंकली गाव विकासात अग्रेसर ठेवू , असे प्रतिपादन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केले.
अंकली येथे सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रचारार्थ प्रचारफेरी काढण्यात आली त्यावेळी नागरिकांबरोबर संवाद साधताना ते बोलत होते. 
 माजी सरपंच कीर्तीकुमार सावळवाडे, सुनील पाटील, किरण कुंभार यांनी आयोजित केलेल्या प्रचारफेरीला प्रचंड प्रतिसाद लाभला. सुधीरदादा गाडगीळ यांचे गावात वाजंत्री लावून फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. महिलांनी त्यांचे औक्षण केले.
 सुधीरदादा म्हणाले, आजपर्यंत मोठा निधी आपण अंकली गावाला दिला आहे. ह्या निधीच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात अंकली गावाचा विकासकामांच्या माध्यमातून जो कायापालट झाला आहे त्याबद्दल मला समाधान वाटते. 
  कुंभार गल्ली, सोसायटी परिसर, जैन बस्ती रोड, ग्रामपंचायत परिसर,सांगली कोल्हापूर रोड, हरिपूर रोड, मळीभाग, सिद्धार्थ परिसर या ठिकाणी प्रचार फेरी काढण्यात आली. जैन बस्ती तसेच विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. प्रचार फेरीत ठिकठिकाणी दादांचे घोषणा देत आणि फटाक्यांच्या आतषबाजीत उत्साहात स्वागत करण्यात आले. प्रचारफेरीची सांगता कोल्हापूर रोड येथील श्री गजानन महाराज मंदिरात झाली.
 माजी सरपंच कीर्तीकुमार सावळवाडे,माजी सरपंच सुनील पाटील, माजी सरपंच किरण कुंभार, उपसरपंच माधुरी परिट, सुरज कोळी, प्रमोद खवाटे, माजी सभापती त्रिशला खवाटे, शुभम उगारे, सम्मेद चौगुले, नितीन पाटील, बंटी जाधव, शकुंतला माळी, मनीषा गळगे, राणी शंकर गळगे, परशुराम माळी, संतोष सुतार, सुनील चौगुले, अनिल चौगुले, पंकज पाटील, अरुण नाईकनवरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post