सामान्य जनता माझ्या पाठीशी मी त्यांच्याच जीवावर निवडून येणार -पृथ्वीराज पाटील



सांगली प्रतिनिधी 

सामान्य आणि आम जनता आपल्या पाठीशी आहे त्यांच्या जीवावरच आपण निवडून येणार आहे.सांगली विधानसभेचा मतदारसंघ हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता पण गेल्या १५ वर्षापासून सांगली विधानसभेत कॉंग्रेसचा पराभव होत चालला आहे. हा पराभवाचा कलंक पुसून काढण्यासाठी आणि हा मतदारसंघ पुन्हा एकदा काँग्रेसचा बालेकिल्ला करण्यासाठी आपण मैदानात उतरलो आहे. असे ठाम प्रतिपादन कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले. तसेच श्रीमती जयश्रीताई पाटील यांना विधानपरिषदेचे आमदार करण्याचे आश्वासन पक्षश्रेष्ठींनी दिले आहे ते पूर्ण करण्याचे काम ही आपणस करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.

सांगली विधानसभेची उमेदवारी पृथ्वीराज पाटील यांना जाहिर झाल्यानंतर त्यांनी मंगळवारी शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. सांगलीच्या गणरायाचे दर्शन घेवून त्यांनी सांगली शहरातून रॅली काढत काँग्रेस कमिटी येथे मेळावा घेतला त्यानंतर त्यांनी अर्जकाँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष  पृथ्वीराज बाबा पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरताना राष्ट्रवादीचे राहुल पवार बजरंग पाटील शिवसेना प्रमुख जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ महिला व आशाताई पाटील समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन मिरजकर कम्युनिस्ट पार्टीचे जिल्हाध्यक्ष काँग्रेस उमेश देशमुख उपस्थित  दाखल केला.

मेळाव्यात बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाले, सन २०१९ साली आपणास पक्षाने संधी दिली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वारे होती. त्या वाऱ्यात तू टिकणार नाहीस असे अनेकांनी आपणास सांगितले. पण सांगलीवर जनतेच्या मनात वेगळेच होते. त्यांनी आपणास या मोदी यांच्या लाटेत सुध्दा भरभरून मतदान केले आणि आपणाला ८६ हजार मते दिली. थोडक्यात आपला पराभव झाला पण या पराभवाने आपण खचून गेली नाही. या पराभवाच्या दुसऱ्या दिवसापासून आपण कामाला सुरवात केली, सन २०१९चा महापूर जासो कोरोनाचा काळ असो, २०२२ आणि २०२४ था महापूर अली यामध्ये आपण आघाडीवर होती. लोकांशी सातत्याने संपर्क ठेवला त्यांच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळे लोक आपल्या पाठीशी उभे राहिले आहेत.

आम जनतेची काम करत असताना अनेक चांगले उपक्रम राबविले गेले या उपक्रमातूनच आपणाला लोकांनी चांगली साथ दिली आहे. तसेच पक्षश्रेष्ठींनीही आपल्या कामाची दखल घेत आपणास उमेदवारी दिली आहे ही उमेब्रवारी आपणास देत असतांनाच त्यांनी श्रीमती जयश्रीताई पाटील यांना विधानपरिषदेचा शब्द त्यांनी दिली आहे. हा शब्द पूर्ण करण्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करणार आहे.
सांगली लोकसभेत विशाल पाटील यांच्याविरुध्द अनके कद कारस्थाने झाली.

पण काँग्रेसच्या एकजुटीने विशाल पाटील हे निवडुन आले आणि भाजपाचा 
पराभव झाला आहे. तोच पेंटर्न सांगली विधानसभेत आपण करणार आहोत आणि काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकरर्चाच्या साथीने हे यश मिळवणार असल्याचेही
त्यांनी सांगितले,
यावेळी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,

Post a Comment

Previous Post Next Post