मराठा व धनगर समाजाला महायुतीच न्याय देणार, आ सुधीर दादा गाडगीळ हे राज्यात आदर्श लोकप्रतिनिधी ------ केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ


सांगली प्रतिनिधी 
काँग्रेस सत्तेच्या काळात केवळ भूमिपूजन होत असे, मात्र भाजप सत्तेत आल्यापासून 2047 पर्यंत विकसित भारताचा संकल्प केला आहे असे मत केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केले.
दरम्यान मराठा समाजाचे नेते चार-चार वेळा मुख्यमंत्री झाले, मात्र समाजाला न्याय देवू शकले नाहीत. अण्णासाहेब पाटील यांचे मराठा समाजासाठी शहीद झाले, मनोज जरांगे-पाटील यांची मागणी योग्य आहे. त्याबाबत सरकार सकारात्मक असून मराठा आणि धनगर समाजाला केवळ महायुती सरकारच न्याय देईल, अशी ग्वाही ही त्यांनी दिली.
सांगलीत भाजपचे उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ यांच्या बापट मळ्याजवळील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केंद्रिय राज्यमंत्री मोहोळ यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आ. सुधीर गाडगीळ यांच्यासह भाजपाचे किसान मोर्चाचे प्रदेशउपाध्यक्ष पृथ्वीराज पवार ,अजितदादा राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, भाजपाचे शहराध्यक्ष प्रकाश ढंग अविनाश मोहिते, उपस्थित होते.
राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, पत्रकारांशी बोलत होते, ते म्हणाले, मराठा समाजाचा अनेक वर्षापासून प्रश्न प्रलंबित आहे. समाजाने अनेक नेते मुख्यमंत्री झाले, मात्र कुणी न्याय दिला नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिले, मात्र महाविकास आघाडी सरकारला आरक्षण टिकविता आले नाही. मराठा समाजाचे नेते अण्णासाहेब पाटील शहीद झाले, मात्र आरक्षण मिळाले नाही. मनोज जरांगे-पाटील आरक्षणासाठी लढा उभारत आहेत. त्यांची मागणी योग्य आहे. धनगर समाजही आरक्षणासाठी आग्रही आहे, त्यांचाही वर्षानुवर्षे प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे दोन्ही समाजाला महायुती सरकारच न्याय देईल.
देशात काँग्रेसचे पंतप्रधान असताना एक रुपाया जनतेला दिला तर 15 पैसेच पोहोचत असल्याचे राजीव गांधी यांनी कबूल केले होते. भाजप सरकार सत्तेत भ्रष्टाचाराला पायबंद घातला आहे. आता थेट मदत लाभार्थींच्या खात्यावर जमा होत आहे. काँग्रेस सरकारच्या काळात केवळ भूमिपूजन केले जात होते, काम कधी पूर्ण झालेच नाही, हे सर्वश्रुत आहे. सध्या 158 विमानतळ तयार आहेत, पुढील दहा वर्षात शंभर विमानतळ होतील. भाजप सरकार 2047 पर्यंत विकसित भारताचा संकल्प करीत असल्याचे राज्यमंत्री मोहोळ यांनी सांगितले.
राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार
राज्यात पुन्हा महायुती सरकारलाच संधी जनता संधी देईल, असा विश्वास मंत्री मोहोळ यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारने राज्यात 10 लाख कोटी कामे केली आहेत. गरीबांसाठी जीवनाश्वयक योजना राबविल्या जात आहेत. इन्फ्रास्ट्रक्चरसह विकासचे प्रकल्प मार्गी लावले. अटल सेतू, कोस्टल रोड, मेट्रो सुरु केली. केंद्राच्या किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यानेही सहा हजार रुपये दिले आहेत. शेतकर्‍यांना वर्षाला 12 हजार खात्यावर जमा होतात. म्हणून डबल इंजिन सरकार म्हणतात. महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे. जनतेच्या अपेक्षा राज्य सरकारकडून पूर्ण होत असल्याने महायुती सरकार सत्तेत यईल.

दादांची हॅटट्रिक झाल्यास सन्मानाचे पद
आमदार सुधीर गाडगीळ आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून सांगलीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहेत. स्वच्छ, सरळ, सुसंवादी व्यक्तिमत्व असल्याने जनमाणंसात चांगली प्रतिमा आहे. त्या भूमिकेतून पक्षाने पुन्हा तिकीट दिले असून त्यांची हॅटट्रिक झाल्यास दादांना राज्यात सन्मानाचे पद दिले जाईल, असेही केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले.
.
कवलापूर विमानतळाच्या प्रश्नाला गती देवू
सांगली शहराच्या विकासासाठी विमानतळ आवश्यक आहे. कवलापूर विमानतळाबाबत आ.सुधीर गाडगीळ यांच्यासह लोकप्रतिनिधी पाठपुरावा करीत आहेत. विमानतळाच्या जागेबाबत एमआयडीने भूसंपादनाचा प्रस्तव राज्य शासनाला पाठविला आहे. त्यानंतर एनएआयडीसीला पाठविण्यात येईल. येत्या काळात विमानतळाच्या कामाला गती देणार असल्याचे केंद्रिय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
------------

Post a Comment

Previous Post Next Post