काँग्रेस पक्षाच्या दोन्ही उमेदवारांचा पक्षश्रेष्ठीवर विश्वास नसल्याने बंडखोरीची भाषा करत आहेत - दिगंबर जाधव

सांगली : विधानसभा निवडणुकीत सांगलीत काँग्रेस नेत्यांनी दोघा इच्छुकांना एकाने विधानसभा लढावी, तर दुसऱ्याने विधानपरिषद लढावी, असा तोडगा काढला आहे. परंतु नेत्यांवर इच्छुकांचा विश्वासच नाही. उद्या विधान परिषदेचा शब्द पाळला नाही तर, असा अविश्वास त्यांना वाटतो. त्यामुळे ही जागा महाआघाडीच्या नेत्यांनी उद्धवसेनेला द्यावी, अशी मागणी संघटक दिगंबर जाधव यांनी केली.

सांगलीत भाजप आमदार गाडगीळ यांनी निवडणुकीपूर्वीच तलवार म्यान केली होती. पण, त्यांना मदत होण्यासारखी परिस्थिती कॉंग्रेसमधील बंडखोरीने निर्माण केली आहे. काँग्रेसने येथे कोणालाही तिकीट दिले तरी एकमेकांना पाडण्याचा उद्योग केला जाणार आहे. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप करून उद्धवसेनेला जागा द्यावी, अशी मागणी जाधव यांनी केली.
-------------

दादा घराणे सोडून इतरांना काय मिळाले ?
सांगलीत काँग्रेसच्या दोन इच्छुक उमेदवारांमध्ये विनाकारण चढाओढ दिसून येत आहे. यातून भाजप उमेदवारांस कशी मदत होईल यासाठी काहीजण प्रयत्न करत आहेत. सांगलीत उमेदवारी जाहीर करून जागा निवडून आणणे जमत नसेल, तर ही जागा उद्धवसेनेला द्यावी. स्वत:ला दिग्गज नेते समजणाऱ्यांना येथील वाद थांबवता येत नसल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. माजी मंत्री प्रतीक पाटील हे पक्षाचे क्रियाशील सदस्य नाहीत. तरीही अन्याय झाला म्हणून आरोप करत आहेत. आजवर दादा घराणे सोडून इतरांना काय मिळाले, हे सांगावे, असा प्रश्न जाधव यांनी उपस्थित केला.

Post a Comment

Previous Post Next Post