विद्यमान आमदारांना जनतेबद्दल अस्था, प्रेम नसल्याने विकास खुंटला धैर्यशील मोरे

 बहे येथे विविध विकास कामांचा शुभारंभ

इस्लामपूर : प्रतिनिधी
इस्लामपूर विधानसभा मतदार संघात फक्त विकास कामाच्या बाता मारणाऱ्या विद्यमान आमदारांना गेल्या ३५ वर्षात बहे येथील साधा स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावता आला नाही. येथील जनतेबद्दल त्यांना अस्था, प्रेम नसल्याने हा विकास खुंटला आहे. आता हे बदलण्यासाठी प्रत्येकाने आपल्यातील स्वाभीमान जागा करुन परीवर्तनाच्या लढाईत सामील व्हावे, असे आवाहन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे यांनी केली.

बहे (ता.वाळवा) १२ कोटी ११ लाख २९ हजार रुपयांच्या विविध विकास कामांच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रदेश भाजपा निमंत्रित सदस्य प्रसाद पाटील, तालुकाध्यक्ष निवास पाटील, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महिला आघाडी अध्यक्षा सुरेखाताई जगताप, विजयमाला पाटील, ओबीसी मोर्चा अध्यक्ष मधुकर हुबाले, यदुराज थोरात प्रमुख उपस्थित होते.

धैर्यशील मोरे म्हणाले, गेल्या ३५ वर्षात विद्यमान आमदारांनी जाणीवपूर्वक पाणंद रस्ते केले नाहीत. शेतकरी आर्थिक समृद्ध झाला तर त्यांच्या विचारात बदल होतो. त्यामुळे ही लोक अशीच कशी राहतील, याची काळजी त्यांनी परिपूर्ण घेतली. परंतु आता निशिकांतदादांसारखे उमदे नेतृत्व वाळवा तालुक्याला मिळाले आहे. त्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत साथ द्या. येणाऱ्या पाच वर्षात इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचा चेहरा-मोहरा आपलेला नक्कीच बदलेला दिसेल, असा मी तुम्हाला यानिमित्ताने विश्वास देतो.

प्रसाद पाटील म्हणाले, विद्यमान आमदारांनी एका कारखान्याचे चार कारखाने केले. परंतु त्यांच्या या कारखान्याला येणारा ऊस ज्या पाणंद रस्त्याने येतो, तो इतक्या वर्षात करता आला नाही. सध्या कारखान्याला ऊस पाठवताना शेतकऱ्यांना पाणंद रस्त्याला चार-चार ट्रॅक्टर लावून तो बाहेर काढावा लागतो. त्यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. परंतु विद्यमान आमदारांना आजपर्यंत या शेकऱ्यांना आर्थिक त्रासातून बाहेर काढता आलं नाही, हे येथील लोकांचे दुर्देव आहे. विद्यमान आमदारांनी आजपर्यंत फक्त विकास कामांचे नारळ फोडण्याचे काम केले. पण ती विकासकामे मार्गी लावली नाहीत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निशिकांतदादांना साथ द्या. आम्ही त्यांच्या माध्यमातून मुस्लिम समाज दफनभूमी रस्ता, मातंग समाज रस्ता व भैरवनाथ मंदिर रस्ता व संरक्षण भिंत ही कामे मार्गी लावू, असा विश्वासू विश्वास मी या निमित्ताने तुम्हाला देतो.

निवास पाटील म्हणाले, निशिकांतदादांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना राबवून लोकांना मोठा लाभ मिळवून दिला आहे. महायुती सरकारने महिलांना एसटीमध्ये अर्धा तिकिटात प्रवास करण्याची योजना आणली. मुलींना उच्च शिक्षण मोफत केले. लाडकी बहीण योजनेवर तर विरोधकांनी प्रचंड टीका केली होती. पण ही योजना सुद्धा आमच्या सरकारने यशस्वी करून दाखविली आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत फक्त सत्ता उपभोगण्यासाठी जनतेचा वापर करणाऱ्या आमदारांना धडा शिवण्यासाठी सर्वांनी निशिकांतदादांना साथ द्या.

यावेळी चंद्रसेन पाटील, संजय मुळीक, धनंजय थोरात, विजयमाला पाटील (काकी), शहाजी पाटील, गणेश शेवाळे, अशोक सलगर, राजेंद्र पाटील, संगीता फुलारी, वंदना थोरात, प्रमोद सुतार, प्रशांत थोरात, लवाजी देशमुख, अर्जुन खरात, भगवान यादव, विलासराव पाटील, दिनकर मोहिते, पांडुरंग शेवाळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बहे : येथे विविध विकास कामांच्या उदघाटन प्रसंगी बोलताना धैर्यशील मोरे, व्यासपीठावर प्रसाद पाटील, निवास पाटील आदी.

Post a Comment

Previous Post Next Post