कॉलेज परिसरात निर्भया पथकांनी ऍक्टिव्ह मोडवर येण्याची गरज -लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे



सांगली प्रतिनिधी 

सध्या सांगली सह परिसरातील महाविद्यालयांच्या आवारामध्ये महाविद्यालयांमध्ये अनेक तरुणींची छेडछाड करण्याचे प्रकार होत असताना दिसत आहेत .पोलीस प्रशासनाच्या वतीने निर्भया पथकांची नेमणूक करण्यात आली असून सदर निर्भया पथके ही शहरासह परिसरातील महाविद्यालयांच्या आवारामध्ये गस्त घालून अशा प्रकारांवर आळा घालण्याचे काम करत असते परंतु ,या पथकाने सध्या आणखी ऍक्टिव्ह मोडवर येण्याची आवश्यकता आहे .कारण मुलींचे छेडछाड होण्याचे तसेच मुलींवर हल्ला होण्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत .आजच कॉलेज कॉर्नर वरील एका महाविद्यालयातील तरुणीवर चाकू हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला आहे त्यामुळे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी ही पदके पुन्हा सक्रिय करण्याची आवश्यकता भासत आहे .याबाबत लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना निवेदन देऊन निर्भया पथकांच्या माध्यमातून असे गैरप्रकार रोखण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे .

Post a Comment

Previous Post Next Post