सांगली महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये एखाद्याचा बळी गेल्यावरच खड्डे मुजवणार का ?लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांचा सवाल--खड्डे मुजवण्याचे आयुक्तांना भावनिक अवाहन

सांगली प्रतिनिधी 
              सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील अनेक रस्त्यांवर भलेमोठे खड्डे पडले असून या रस्त्यातून वाट काढत प्रवास करणं नागरिकांना जिकरीचं होत आहे .जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून सध्या नागरिक प्रवास करत असून सदर खड्ड्यांमध्ये एखाद्याचा बळी गेल्यानंतरच महानगरपालिकेचा बांधकाम विभाग याकडे लक्ष देणार का ?असा सवाल लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी उपस्थित केला आहे .
              गणेशोत्सव काहीच दिवसावर येऊन ठेपलेला असतानाही महापालिका प्रशासनाकडून या गंभीर प्रश्नाकडे अक्षम्य दुर्लक्ष का होत आहे .महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त शुभम गुप्ता यांनी इतर कामांप्रमाणेच याही कामांमध्ये लक्ष घालून संबंधित विभागाची कानउघाडणी करून लवकरात लवकर हे खड्डे मोजवावेत असे भावनिक आवाहन लोकहित मंचेचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केले आहे .
       येत्या दोन-तीन दिवसांमध्ये सदर रस्त्यावरील खड्डे पूर्णपणे मुजवण्यात यावेत अन्यथा या खड्ड्यांचे आणि खड्डेमय रस्त्यांचे फोटो महानगरपालिकेच्या गेटवर लावून त्याचे प्रदर्शन भरवणार असल्याचा इशारा मनोज भिसे यांनी दिला आहे .

Post a Comment

Previous Post Next Post