लोकहित मंचाच्या आंदोलनाला यश ; आयुक्त शुभम गुप्ता यांनी भर पावसात शामरावनगरची केली पाहणी

सांगली : सांगली शहरा लगत असणाऱ्या शामरावनगर परिसरामध्ये नागरी समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. लोकहित मंचाकडून वारंवार आंदोलने करून प्रशासनाला निदर्शनास आणून दिल्यानंतर आज सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी भर पावसात शामरावनगर भागाची पाहणी करून या परिसरात असणारे गटारी मोकळ्या भूखंडावर साचलेलं पाणी याचा निचरा कशा पद्धतीने करता येईल याचे योग्य नियोजन आखून लवकरात लवकर पाणी निचरा करण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. लोकहित मंच यांच्या पाठपुरायला आज अखेर यश मिळाले आहे. लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे यांच्यासमोरच आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिले आहेत. तात्काळ मोकळ्या भूखंड आहेत. त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी असे आदेश दिले आहेत. आयुक्तांनी आंदोलनाची दखल घेऊन पाणी केल्याबद्दल लोकहित मंचाकडून त्यांचे स्वागत करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post