सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन चा मनमानी कारभार

 

गेल्या अनेक वर्षीय सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन मध्ये कार्यकारणी वरून तसेच विविध विषयावरून चर्चेत असलेली संघटना याला सांगली जिल्ह्याचे अर्जुनवीर श्री राजू भावसार, श्री छत्रपती पुरस्कार विजेते गणेश शेट्टी, सौ स्वाती करंदीकर, अतुल माने, जयवंत पाटील या राष्ट्रीय खेळाडूंनी वादाला तोंड फोडून जिल्ह्यातील सर्व खेळाडूंना न्याय मिळवून देण्याचे ठरवले आहे. याचा पहिला टप्पा म्हणून राज्य कार्यकारणीला जी नावे पाठवायची आहेत ती जिल्ह्यातील सर्व क्रीडा संस्था, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू यांना विचारात घेऊनच पाठवावीत. जिल्ह्याची वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊन ती नावे सर्वांनुमते पाठवावीत असे निवेदन माननीय जिल्हाधिकारीसो यांना देण्यात आले. 
कबड्डी हा खेळ सांगली जिल्ह्याच्या मातीत रुजलेला असून सांगली जिल्ह्यातून मा. राजू भावसार यांच्या रूपाने अर्जुन पुरस्कारथी खेळाडू तयार झाला आहे. त्याचप्रमाणे श्री गणेश शेट्टी स्वाती खाडीलकर असे श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू घडले आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय पुरुष महिला राष्ट्रीय खेळाडू सांगली जिल्ह्याने दिले आहेत, असे असताना लोकशाही भिमुख सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची गरज असताना विद्यमान पदाधिकारी मनमानी कारभार करीत असून गेली कित्येक वर्षात ना कार्यकारी मंडळ सभा, ना वार्षिक सभा, घटनेप्रमाणे निवडणूक असे कोणतेही कामकाज केलेले नाही.
माननीय जिल्हाधिकारी सो, यांना दिलेल्या निवेदनात 30 जून पूर्वी सांगली जिल्ह्यातून चार प्रतिनिधींची नावे पाठवायची असताना घटनात्मक सर्वांना घेऊन निर्णय व्हावा हे अपेक्षित आहे. सदर आंदोलन हे जिल्ह्याचे अर्जुनवीर राजू भावसार, श्री छत्रपती पुरस्कार विजेते गणेश शेट्टी, सौ स्वाती करंदीकर यांच्या नेतृत्वात होत आहे. तरी जिल्ह्यातील सर्व आजी-माजी खेळाडूंनी तसेच सर्व कबड्डी संघटनांनी या आंदोलनास पाठिंबा द्यावा असे आवाहन अर्जुनवीर श्री. राजू भावसार यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post