संजयकाका पाटील यांनी जिल्ह्याची वाट लावली-अजितराव घोरपडे

सांगली : भाजप आणि संजयकाकांच्या पराभव करण्याची मोठी संधी जनतेला मिळाली आहे. देशाप्रमाणे जिल्ह्याचे स्थितीही वाईट आहे. खासदारांनी जिल्ह्याची वाट लावली असून अनेक सहकारी संस्थाही खासदारांनी बंद पाडल्या. शेतकºयाचे भवितव्य वाचविण्यासाठी संजयकाकांना घरी बसविण्याची गरज आहे, अशा शब्दात माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी भाजपवर हल्ला चढविला.

सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ आरग येथे जाहीर सभा झाली. या सभेत घोरपडे बोलत होते. ते म्हणाले की, १९९५ साली बंड करून एक न्याय मिळविला. बिन पाण्याच्या जमिनीला पाणी मिळविले. आता दुसºयांदा क्रांती करण्याची वेळ आली आहे. भाजप व खासदारांचे गंडात्यर उलथून टाकण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. जीएसटी, महागाईने देशाची वाट लावली आहे. भाजपला आता थांबविले नाही तर पश्चाताप करण्याची वेळ येईल. खासदार संजयकाका पाटील यांना सातबाºयाशिवाय काहीच दिसत नाही. जमिनी घ्यायच्या आणि प्लॉट पाडून विकायचा इतकाच उद्योग संंजयकाकांनी केला. विद्यमान खासदार पाच वर्षे जनतेतही फिरकले नाहीत. विशाल पाटील हे गायब होणारे खासदार नाहीत. विशालदादांना निवडून आणून भावी पिढीच्या विकासाचा मार्ग खुला करावा, असे आवाहन केले.

विशालदादा पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत आपल्याकडे चिन्ह नसेल असे वाटले नव्हते. आघाडी धर्म पाळताना निष्ठावंत कार्यकर्त्यांचा बळी जावू नये, याचे भान नेत्यांनी ठेवण्याची गरज आहे. माजी मुख्यमंत्र्यांनी मला उमेदवारीचे आश्वासन दिले. निवडणूक लागली आणि ते भाजपमध्ये गेले. पृथ्वीराज चव्हाण यांनी उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले. ते निवड समितीत होते. पण त्यांना आघाडीच्या बैठकीला बोलाविले नाही. माझी तीही आशा संपली. जे कोणी माझे नाव घ्यायचे ते एक तर पक्ष सोडून जायचे अथवा त्यांना समितीच्या बैठकीला येऊ दिले नाही. पाच वर्षापूर्वी अन्याय झाला. यंदाही उमेदवारीपासून चिन्हापर्यंत त्रास दिला. पण जनतेच्या पाठबळावर निवडणुक रिंगणात उतरलो आहे. माझी उमेदवारी जनतेची, जनतेसाठी असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post