ढिम्म मनपा प्रशासन जीवितहानी झाल्यावर जागे होणार का? आनंद लेंगरे




सांगली प्रतिनिधी 
  पाटणे प्लॉट संजय नगर येथील बेवारस राम जानकी इमारत धोकादायक झाली असून स्ट्रक्चर ऑडिट करून योग्य तो निर्णय घेऊन भविष्यात होणारी जीवित हानी टाळावी या मागणीचे निवेदन आयुक्त महानगरपालिका यांना मदन भाऊ युवा मंच जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे यांनी दिले आहे,
 सदर इमारती बाबत वारंवार पत्र व्यवहार करून मनपा प्रशासनास कळविण्यात आले आहे. तरीसुद्धा कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी झालेली नाही. भविष्यात मोठा अनर्थ होण्याची दाट शक्यता असून जीवितहानी झाल्यास मनपा प्रशासन जबाबदार राहील. संजय नगर परिसरातील पाटणे प्लॉट येथील रामजानकी इमारत बांधकाम करून 50 वर्ष अधिक काळ झाला आहे. सदर इमारत 40 वर्षाहून अधिक काळ बंद असून देखभाल दुरुस्ती कोणत्याही प्रकारे केलेली नाही. सदर इमारत ही तीन मजली असून अत्यंत धोकादायक स्वरूपात आहे. सदर इमारतीच्या वरील भाग काही अंश पडला आहे. वरील भाग एका बाजूला झुकला असून कोणत्याही क्षणी कोसळण्याची दाट शक्यता आहे.
 सदर इमारत ही गुंठेवारी भागातील असून इमारतीच्या लगत बरीचशील बैठी घरे असून इमारत ढासळली तर आजूबाजूच्या बैठ्या घरांची खूप मोठे नुकसान होऊन जीवित आणि होण्याची दाट शक्यता आहे. अशी परिस्थितीत ही धोकादायक इमारत पाडण्यात गरजेचे आहे. मनपा प्रशासनाने ही बेवारस इमारत फौजदारी करून पाडण्यात यावी. सदर इमारत पाडण्याबाबत या परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी महापालिकेकडे तक्रार केली आहे. तरी आपल्या मालमत्ता विभागाकडून कोणती कार्यवाही झालेली नाही. सदर इमारत ही अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्यापासून भागातील नागरिकांनी खुली केली आहे. सदर इमारतीचा मागील तीन महिन्यापासून वापस सुरू असून नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. इमारतीच्या आतील भागास पूर्ण तडे गेले असून, कॉलम व बिंब एकमेकापासून वेगळे झालेले असून एका साईटला झुकलेले आहेत. तरी याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून ही धोकादायक इमारततिचे वरील दोन मजले उतरविण्यात यावेत. 
काहीच दिवसात पावसाळा सुरू होणार असून ही इमारत आणखीनच धोकादायक बनणार असून सदर इमारतीच्या वारसदारांचा शोध घ्यावा घेऊन अथवा आपल्या स्तरावर योग्य ती कारवाई करून पुढील होणारा अनर्थ टाळावा वारंवार मालविवाह मालमत्ता विभागाशी पत्र व्यवहार करूनही आत्तापर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. दुर्दैवाने भविष्यात जीवित हानी झाल्यास जबाबदार कोण? तरी आपण स्वतः लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी  व होणारा अनर्थ टाळावा अशी मागणी आनंद लेंगरे 
जिल्हाध्यक्ष,मदनभाऊ पाटील युवा मंच याने आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात केली आहे,

Post a Comment

Previous Post Next Post