संत चोखामेळा अध्यासन केंद्र- वृंदावन फाऊंडेशन - चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेची आयोजित " चित्रमय समता वारी अहवाल पुस्तिका प्रकाशन सोहळा हभप गुरुवर्य गुरुबाबा औसेकर महाराज यांच्या शुभहस्ते श्री नाथ संस्थान मंदिर औसा येथे करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते . चंद्रभागेच्या तिरी श्री विठ्ठलाच्या अस्तित्वाला , केंद्र मानून अठरापगड जातींना एकत्र करणारा ' महासमन्वय ' म्हणजे वारकरी संप्रदाय .त्याची मूळ बहुजनांच्या आध्यात्मिक हिताच्या मानवीय व्यवहारात गुंतलेली आहेत , समाजात बंधुभाव अन सामाजिक एकता प्रस्थापित करावयाची असेल तर , वारकरी संप्रदाय हेच एकमेव अधिष्ठान आहे , " चोखोबा ते तुकोबा - एक वारी समतेची " हा उपक्रम म्हणजे त्या समन्वयवादी विचारांची एक पाऊलवाट आहे . संत चोखामेळा महाराज यांच्या समाधीमंदिरापासून निघणारी ही समता वारी संत चोखोबांच्या विचारांचा जागर करणारी असून या सर्व कार्याच्या पाठीशी श्री नाथ संस्थान आहे . असेही पुढे बोलतांना त्यांनी प्रतिपादन केले . याप्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर चे अध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर . माजी खासदार प्रोफेसर सुनीलराव गायकवाड , चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेची चे निमंत्रक , संत चोखामेळा अध्यास केंद्राचे संस्थापक सचिन पाटील , ज्येष्ठ नेते सुनीलअप्पा उटगे , सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब येरमाळकर , विनोद जाधव आदी उपस्थित होते .
Tags
लातूर प्रतिनिधी