सुज्ञ जनताच विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करेल - निशिकांत भोसले-पाटील


इस्लामपूर : प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकाने त्यांच्या काळात फक्त आश्वासने दिली, मात्र आपल्या महायुतीच्या सरकारने सर्व घटकांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या. त्यामुळे जनतेला हे आपलं सरकार वाटत आहे. विरोधकांनी किती ही कांगावा करण्याचा प्रयत्न केला तरी सुज्ञ जनता विद्यमान आमदारांचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे प्रतिपादन इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांनी केले.

इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील आष्टा येथे प्रचार दौऱ्या दरम्यान ते बोलत होते. यावेळी त्यांनी शहरातील काशिलिंग नगर, डांगे कॉलेज परिसर, सिध्दार्थ नगर, जुगाई मंदिर परिसर, खोत मळा, संतसेना, अदिष्ठा नगर आदी भागातील नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी सतीश बापट, पोपट भानुसे, प्रवीण माने, अमोल पडळकर प्रमुख उपस्थित होते.

निशिकांत भोसले-पाटील (दादा) म्हणाले, विरोधकांनी आज आष्टा शहरात चार-चार गट केले आहेत. त्यामुळे एकमेकांचे पाय खेचण्यामुळे शहराचा विकास खुंटला आहे. येथे अडीचशे एकर जमीन क्षारपड आहे. तिथे एमआयडीसी झाली असती तर तरुणांना रोजगार मिळाला असता. लोक सक्षम बनली असती. परंतु आपले राजकारण संपुष्टात येईल, या भीतीने विद्यमान आमदारांनी जाणीवपूर्वक ती काळजी घेतली. जो माणूस ३५ वर्षात तुम्हाला रोजीरोटी देऊ शकत नाही. मग त्याला निवडून देऊन तुम्हाला काय मिळाले. लोक म्हणतात दादा आता बिनकामाचे पार्सल कासेगावला पाठवा. पण मी त्यांना म्हटलं कासेगाववाली ही त्याना कंटाळली आहेत. ते पण त्यांना घ्यायला तयार नाहीत. त्यांना आता सगळेच वैतागली आहेत. त्यामुळे यंदा बदल नक्की आहे.  

प्रवीण माने म्हणाले, विद्यमान आमदारांनी आष्टा शहराला विकासापासून जाणीवपूर्वक वंचीत ठेवलं. या भागातील ऊस बाहेर जाईल, या भावनेने त्यांनी पाणंद रस्ते ही केले नाहीत. पण आता इस्लामपूर विधानसभा मतदार संघात वार फिरल आहे. निशिकांतदादांचा विजय नक्की आहे. दादा तुम्हाला आम्ही शब्द देती की, आम्ही सर्वजण मिळून आष्टा शहरातून तुम्हाला सर्वात मोठे मताधिक्य देऊ. दादा तुमच्या विजयात व विद्यमान आमदारांच्या पराभवात सुद्धा आष्टा शहराचाच मोठा वाटा असेल.

यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 विरोधकांनी घरे फोडायची तर निशिकांतदादांनी ती जोडायची काम केली..
        यावेळी बोलताना पोपट भानुसे म्हणाले,  
महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणून महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न केलाच पण त्या आधी निशिकांतदादांनी महिलांना मोफत आरोग्य सेवा देऊन मतदार संघातील महिलांचे अश्रू पुसले आहेत. आजपर्यंत विरोधकांनी फक्त घरे फोडायची कामे केली आणि निशिकांतदादांनी ती जोडायची काम केली आहेत. त्यामुळे निशिकांतदादांसारख्या नेतृत्वाला विधानसभेत पाठवून आपण हा मतदार संघ एक चांगला कुटुंब बनवूया. 


Post a Comment

Previous Post Next Post