पृथ्वीराजबाबा पाटील हे महिला बाबतीत संवेदनशील आहेत - विजया पाटील

 

पृथ्वीराज पाटील हेच सुसंस्कृत उमेदवार असून तेच महिलांचा सन्मान करु शकतात.. महिलावर ज्या ज्या वेळी अत्याचार झाले त्या त्या वेळी त्यांनी रस्त्यावर उतरून स्थानिक प्रशासन व पोलीस खाते आणि महायुती शासनाला जाब विचारला आहे. सांगलीच्या बदलाचं व्हिजन त्यांच्या कडे आहे. तेच सांगली अधिक चांगली करण्यासाठी सक्षम आहेत. हात चिन्हासमोरील बटण दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी आता सांगलीकर महिलांनी ही निवडणूक हाती घेतली आहे असेही त्या म्हणाल्या.


यावेळी विजया पाटील म्हणाल्या, 'महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत. यासाठी आरोपीवर कडक कारवाई केली पाहिजे. यासाठीच आमदार संवेदनशील असावा लागतो. पृथ्वीराजबाबा पाटील हे महिला बाबतीत संवेदनशील आहेत. ते आमदार झाले तर महिलांच्या हाताला काम देणार.. आपले प्रश्न विधानसभेत मांडून न्याय देणार असा विश्वास असल्यानेच सांगलीकर महिला प्रचंड संख्येने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. 

यावेळी आशा पाटील, ज्योती सुर्यवंशी, आश्विनी व महिला पुरुष नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post