सांगली, ता.८ : राज्यातील महायुती सरकारने महिलांना दीड हजार रुपयांचे अनुदान दिले आणि महागाई वाढवली. जीवनावश्यक वस्तूसह महागाईची फोडणी चार हजार रुपयांनी वाढवली. त्यामुळे गोरगरीब जनतेचे ऐन सणासुदीत हाल झाल्याने महिलांचा वाढत्या महागाईमुळे संसाराचा आर्थिक गाडा हाताबाहेर गेला आहे असे मत मोनिका कदम यांनी व्यक्त केले. सांगली विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष महिला उमेदवार जयश्रीताई पाटील यांच्या प्रचार दौऱ्यावेळी त्या बोलत होत्या.
वार्ड क्रमांक १९ येथील प्रचार दौऱ्यावेळी घरोघरी नागरिकांशी संवाद साधून श्रीमती जयश्रीताई पाटील यांना निवडून दिल्यावर सांगली मतदारसंघातील महिलांचे जीवनमान आम्ही उंचावणार. महिलांना स्वयं रोजगार भिमुख प्रशिक्षण देणार असे मत मोनिका कदम यांनी व्यक्त केले.
त्याचबरोबर वार्ड क्रमांक १९ मधील कुंभार मळा गजराज कॉलनी अष्टविनायक कॉलनी गव्हर्मेंट कॉलनीच्या पूर्वेस असणारा भाग प्रचार दौऱ्यावेळी पिंजून काढला. यावेळी त्यांच्या समवेत मदन भाऊ गटाचे प्रवीण अलदार, महेश करनी, विठ्ठल जावीर या सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
सांगली प्रतिनिधी