इस्लामपूर : प्रतिनिधी
इस्लामपूर मतदार संघ हा क्रांतीकारकांचा आहे.गेली ३५ वर्षे या मतदार संघाचे नेतृत्व ज्या व्यक्तीकडे दिले, त्यांनी सत्तेचा उपयोग करत हुकुमशाही राबविली, या हुकुमशाही संपविण्याचा मुहुर्त आता मतदारांनी शोधला आहे. या निवडणुकीच्या निकाला दिवशी येथील हुकुमशाही संपलेली असेल, असे मत हुतात्मा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन वैभव नायकवडी (काका) यांनी व्यक्त केले.
इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत प्रकाश भोसले-पाटील (दादा) यांच्या प्रचारार्थ कारखाना कार्यस्थळावर आयोजीत बैठकीत ते बोलत होते. यावेळी उमेदवार निशिकांत भोसले पाटील (दादा), हुतात्मा दुध संघाचे चेअरमन गौरव नायकवडी, केदार नायकवडी, वाळवा गावाचे सरपंच संदेश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी क्रांतीवीर डाॅ.नागनाथआण्णा नायकवडी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले.
यावेळी बोलताना गौरव नायकवडी म्हणाले, या मतदार संघात सत्तेचा वापर हा सर्व सामान्य जनतेवर दबाव आणण्यासाठी व गुंडागर्दी करण्यासाठी केला.या पुढे ही असले राजकारण चालु दिले जाणार नाही. आता काळ व वेळ बदलेली आहे. विरोधकांचे अविचाराचे सगळे डाव उधळुन लावु. या निवडणुकीत विरोधकांना पराभव दिसु लागल्याने बेताल वकतव्य करत गुंडगिरीची भाषा सुरु केली आहे. विरोधक ज्या पध्दतीने डाव टाकतील, ते सगळे डाव आम्ही उधळुन लावु.
निशिकांत भोसले- पाटील (दादा) म्हणाले, ही निवडणुक सर्वाच्या स्वाभीमानाची आहे. विरोधकांना जनता प्रश्न विचारु लागली आहे. सैरभैर झालेले नेतृत्व गल्ली गल्ली फिराय लागले आहे. आपली वाटचाल विजयाच्या दिशेने सुरु आहे. आपला विजय निश्चित असला तरी गाफील न राहाता उर्वरित प्रचाराचे दिवस महत्वाचे आहेत. तुम्ही एकदा बदल घडवा मी पुढील पाच वर्षात मतदार संघाचा विकासात्मक बदल घडवुन प्रत्येका स्वाभीमानाने जगता येईल, असे काम करुन दाखवितो.
यावेळी अजित वाजे, दिनकर बाबर, संदीप पाटील, भगवान ६पाटील, विश्वास थोरात, नंदकुमार शेळके, विलास थोरात, बबन हवालदार, दादा चव्हाण, तानाजी निकम, जयकर चव्हाण, अशोक खोत, दत्ता चव्हाण यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
इस्लामपूर प्रतिनिधी