लोकसभेत भाजपाचे 400 पार खासदार निवडून येतील .. आ. सुधीर दादा गाडगीळ

सांगली. शनिवार ६ एप्रिल :-  भाजपा स्थापना दिवस आज आमदार सुधीरदादा गाडगीळ जन संपर्क कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ बोलताना म्हणाले  कि  "फक्त दोन खासदार निवडून आल्यानंतर प्रवास करणाऱ्या भारतीय जनता पार्टीने लोकसभेत पूर्ण बहुमत मिळवले. या निवडणुकीत चारशे पेक्षा अधिक खासदार निवडून आणण्याचा निर्धार पंतप्रधान मा. मोदींनी केला आहे. विकसित भारतासाठी आणि गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी यंदा भाजपा 400 पेक्षा खासदार निवडून येतील असा मला विश्वास आहे. निरपेक्ष वृत्तीने काम करणाऱ्यां कार्यकर्त्यांची मोठी फळी कामाला लागली असून मोदींचे स्वप्न पार करणे ही कार्यकर्त्यांना आपली जबाबदारी वाटते. मोदींचे स्वप्न हे प्रत्येक कार्यकर्त्याला आपले स्वप्न वाटले पाहिजे असे समजून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे" असे आवाहन आ. सुधीर दादा गाडगीळ यांनी कार्यकर्त्यांना केले. भाजपा स्थापना दिनाच्या कार्यक्रमात ते आपल्या संपर्क कार्यालयात बोलत होते.
यावेळी माजी शहर शहर जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे म्हैसाळकर, ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे, भालचंद्र साठे, माजी नगरसेवक विनायक सिंहासने, पूर्व  मंडळ अध्यक्ष रविंद्र ढगे, प्रियानंद कांबळे, गौस पठाण, शशिकांत टेके, प्रदीप कार्लेकर निलेश निकम आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post